धरणगाव (प्रतिनिधी) माणसाची श्रध्दा कशी साधी आणि भक्तीपूर्ण असू शकते याचा प्रत्यय नुकताच धरणगावकरांना आला आहे. एका अज्ञात गुहास्थाने धरणगावच्या श्री बालाजी मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी तब्बल ७१ हजाराची देणगी दिली आहे.
दि. २० मार्च २० रोजी चौकशी करत करत श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी.आर.पाटील यांच्याकडे आला होता. त्यावेळी त्या व्यक्तीने सांगीतले की, मी २०१० मध्ये श्री मारोतीच्या वहनाच्या दर्शनाला आलो व नमस्कार करुन माझ्या कंपनीत मला बढती मीळू दे अशी प्रार्थना मारोतीरायाला केली होती. ६ महिन्यांनी मला पुर्वलक्षी प्रभावाने बढती मिळाली. आम्ही कुटूंबीयांना फार आनंद झाला. त्याचवेळी मी घरात सांगीतले की, मागील फरकाची रक्कम श्री बालाजी मंदिराच्या बांधकामासाठी अर्पण करीन. कालांतराने फरकाची रक्कम मला मिळाली ती रक्कम भी बाजूला ठेवली. पण अचानक माझ्या आईची प्रकृती बिघडली अन् मला ती रक्कम आईच्या आजारपणासाठी खर्च करावी लागली. पण त्याचवेळेस मी मनोमन ठरविले की ही रक्कम जेव्हा मंदिराला देईन त्यावेळेस व्याजासह देईन. मी २८-२९ मार्चला येवून तुम्हाला पैसे देतो असे सांगीतले. ही अनोळखी व्यक्ती नांव किंवा कोणताही परिचय न देता निघून गेली. तेव्हपासून मार्चपासून अध्यक्ष डी.आर.पाटील या व्यक्तीची वाट पाहत होते. ते न आल्यामुळे ही व्यक्ती खोटे बोलत असेल म्हणून अध्यक्षांनी विषय सोडून दिला. पण असे खोटे सांगून त्या माणसाला काय फायदा असा विचार अध्यक्षांनी केला. हा विषय सरांनी मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जिवनअप्पा बयस, विलास येवले व दलाश्य चौधरी आदींच्या कानावर घातला. आम्हा सर्वांना त्याचे आश्चर्य वाटत होते. २८-२९ मार्चला येणारी ही व्यक्ती सप्टेंबर आला तरी येत नाही म्हटल्यावर आशा सोडून दिली.
पण दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ही व्यक्ती पुन्हा डी.आर. पाटील यांच्याकडे आली अन कोरोनामुळे मी सांगीतलेल्या तारखेला येवू शकलो नाही. मला क्षमा करा असे म्हणत चक्क ५०० च्या १४२ नोटा अध्यक्षांच्या हातात दिल्या. अध्यक्षांना क्षणभर काय बोलावे, काय करावे हेच सुचत नव्हते. त्या व्यक्तीला घरात बसवून पाणी व चहा दिला. त्यांच्याशी वेगवेगळ्या पध्दतीने बोलले करीत कांही ओळखीचा धागा सापडतो का असा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न निष्कळ ठरले. संपर्क नंबर मागीतला असता त्यांनी मला कुठेही माझे नांव द्यायचे नाही, यामुळे मी नंबर देणार नाही असे त्यांनी सांगीतले. मंदिराचे काम पुर्ण झाल्यावर तुम्हाला बोलावू म्हणून तरी नंबर द्या, अशी विनवणी करुनही त्यांनी नंबर न देता मी तेव्हा बरोबर पोहचेल, असे सांगून ही व्यक्ती घरातून निघून गेली. तुम्हाला सोडतो असे अध्सक्षांनी सांगीतले असतांना नको म्हणून हि व्यक्ती कोणतीही ओळख व नांव न सांगता, मी मुंबईत रहातो, अनामिक आहे, मला कोठेही नांव द्यावयाचे नाही असे सांगत अध्यक्षांना नमस्कार करुन निघून गेली. अध्यक्षांना वाटले आपणच त्यांना साष्टांग नमस्कार घालायला हवा होता असे वाटले, पण त्यांनीच अध्यक्षांना नमस्कार केला, समाजात आज अशी उदाहरण दुर्मीळ आहे.
श्री बालाजी मंदिराच्या कामाला सर्वसामान्य लोकही अनामीक राहून सहकार्य करतात याचे हे उदाहरण आहे. अशा उदाहरणामुळे आम्हा काम करणाऱ्यांही उत्साह मिळतो. लवकरच राजस्थानच्या मजूरांना बोलावून पुन्हा मंदिराचे काम पुर्ववत सुरु करणार आहोत, असे मंडळाचे अध्सक्ष डी.आर.पाटील, उपाध्सक्ष गुलाबराव वाघ, जिर्णोध्दार प्रमुख जिवन बयस, सेक्रेटरी राजेंद्र पवार, सह सेक्रेटरी प्रशांत वाणी व अशोक येवले यांनी सांगीतले.