फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) वाढत्या तापमानाने केळी बागा सुकत चालल्या आहेत. केली उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केली आहे.
गेला काही दिवसांपासून जिल्हात तापमानाचा पारा हा अक्षरशा ४७ डिग्री पेक्षाही अधिक गेलेला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी बांधव खास करून केळी उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल झाले असून वाढत्या तापमानाने केळी बागा सुकत चालल्या आहेत. केली उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.सदरील विषयाचे गांभीर्य ओळखत भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व चे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी शेतकरी बांधवांना हेक्टरी ४३,५०० रुपयांची भरपाई मिळण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी कृषी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यात लागू करण्यात आलेल्या हवामाना आधारित पिक विमा योजनेच्या प्रमाणाकां नुसार १ मे ते ३१ मे दरम्यान सलग पाच दिवस ४५ डिग्री पेक्षा तापमान राहिल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३,५०० रुपये नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आलेली असुन त्या अनुषंगाने कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांना त्वरीत आदेश काढून केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा देण्याची देखील मागणी जावळे यांनी केली आहे.