जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा निवडणुक कार्यक्रम घोषीत केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांस आवाहन करण्यात येते की, दिनांक १ ऑगस्ट, २०२० पासुन जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर परिपुर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमिट करावे. त्यानंतर त्यांची प्रिंट घेऊन पुर्वीप्रमाणे विहित कार्यपध्दती जिल्हाधिकारी यांचेमार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावेत. जुन्या पध्दतीने हस्तलिखीत स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. असे सुरेश पाडवी, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.