TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्याच्या कन्येचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाला सत्कार

वीरगाथा प्रोजेक्टमधील ‘टॉप 25’मध्ये जळगावातील चोपड्याच्या चेतना मराठे

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) : देशासाठी झटणाऱ्या जवानांचे आयुष्य, त्यांनी दाखविलेले अतुलनीय शौर्य आणि बलिदानाची गाथा समाजासमोर नेण्यासाठी भारत सरकारतर्फे ‘वीर गाथा प्रोजेक्ट’ची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रोजेक्टमधील ‘टॉप 25’मध्ये असलेल्या चोपडा तालुक्यातील अकुलखेडे येथील चेतना गणेश मराठे हिचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत सत्कार करण्यात आला. ती सध्या महू येथील आर्मी स्कूलमध्ये सहावीत शिक्षण घेत आहे.

‘वीर गाथा प्रोजेक्ट’ अंतर्गत देशातील ‘सुपर 25’ म्हणजेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 12 ऑगस्ट रोजी, शुक्रवारी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या 25 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील, जळगाव जिल्ह्यातील चेतना गणेश मराठे हिचा समावेश होता. ती सध्या मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी स्कूलमध्ये सहावीची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील गणेश मराठे हे त्याच शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुपर 25 विद्यार्थ्यांच्या यादीत कर्नाटकची अमृता, दिल्लीचा आरीव आणि उत्तराखंडच्या आदिशाचाही समावेश होता.

READ ALSO

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

कारगील युद्धातील हिरो कॅप्टन मनोज कुमार पांडे यांची चित्रगाथा

चेतनाने कारगील युद्धातील हिरो असलेले कॅप्टन मनोज कुमार पांडे यांची चित्रगाथा साकारली होती. त्यांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाचे योगदान चेतनाने चित्रातून सुंदरपणे दाखवून दिले आहे. तिचे हे चित्र “सुपर 25″साठी पात्र ठरले. तिला या समारंभात राजनाथ सिंह यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र, पदक आणि रोख दहा हजारांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले..

देशभरातील 4,788 शाळांमधील 8 लाख विद्यार्थ्यातून निवड

वीर गाथा हा ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या अनोख्या प्रकल्पांपैकी एक आहे. मुलांना प्रेरणा देण्यासाठी आणि सशस्त्र दलांच्या वीर कृत्ये आणि बलिदानाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. 21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 या कालावधीत झालेल्या या देशव्यापी स्पर्धेत 4,788 शाळांमधील 8.04 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना निबंध, कविता, चित्रण आणि मल्टीमीडिया सादरीकरणाद्वारे प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या स्पर्धेतील मूल्यमापनाच्या अनेक फेऱ्यांनंतर 25 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ‘सुपर-25’ म्हणून घोषित करण्यात आले.

‘आझादी का अमृत महोत्सव’, स्वातंत्र्य दिन उत्सवाचा भाग

स्वातंत्र्य दिन – 2022 च्या उत्सवाचा एक भाग म्हणून, राजनाथ सिंह यांनी या सुपर-25 विद्यार्थ्यांना 10,000 रुपये रोख, एक पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट उपस्थित होते. याशिवाय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाला 300 एनसीसी कॅडेट्स आणि आर्मी पब्लिक स्कूल आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यार्थी आणि 400 हून अधिक शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक देखील उपस्थित होते. गॅलेंट्री अवार्डस पोर्टल ऑफ इंडियाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सुपर 25च्या सर्जनशीलतेचे, आवेशाचे आणि उत्साहाचे कौतुक

‘सुपर-25’ चे अभिनंदन करताना, संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या सर्जनशीलतेचे, आवेशाचे आणि उत्साहाचे कौतुक ते म्हणाले, “या मुलांनी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि खुदीराम बोस यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांचा तसेच शौर्य पुरस्कार विजेते मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार संजय कुमार, मानद कॅप्टन बाबा हरभजन सिंग, हवालदार वीर अब्दुल हमीद, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज पांडे, मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि कर्नल संतोष बाबू यांचे शौर्य आणि बलिदान सुंदरपणे दाखवले आहे. या व्यतिरिक्त कर्नल मिताली मधुमिता यांचाही या यादीत समावेश आहे, ज्या भारतीय सैन्यात शौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.”

राजनाथ सिंह म्हणाले, “हे निडर स्वातंत्र्यसैनिक आणि सशस्त्र दलाचे जवान, ज्यांनी आपल्या मातृभूमीची सेवा केली आहे, ते देशाच्या विविध भागांतून आलेले आहेत आणि विविध धर्माचे आहेत. पण त्यांच्यात एक गोष्ट समान आहे, हेच त्यांचे भारतावरील प्रेम ज्यातून ते देशभक्तीच्या समान धाग्याने बांधलेले आहेत.”

राजनाथ सिंह म्हणाले की, केवळ सुपर-25 च्या मुलांमध्येच नाही तर सर्व मुलांमध्ये देशभक्तीची भावना समान आहे, ज्यांनी विविध धर्म आणि ठिकाणचे असूनही ‘वीर गाथा’ स्पर्धेत मनापासून भाग घेतला. ‘वीर गाथा’ ही स्पर्धा देशाच्या वीरांच्या स्मृती जतन करते आणि त्यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या गाथा प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवते. ते पुढे म्हणाले की, स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद म्हणजे देशाचे नायक आणि त्यांच्या प्रेरणादायी कहाण्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव कोरल्या जातील आणि युवा पिढीला राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची प्रेरणा देतील याचा पुरावा आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग आणि अशफाक उल्ला खान यांसारखे स्वातंत्र्यसैनिक आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा उल्लेख करून संरक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांच्या कथांमधून शौर्य आणि बुद्धिमत्ता यांच्यातील समतोल साधण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजून घेण्याचे आवाहन केले.

देशाला नवीन उंचीवर नेण्याच्या आणि जबाबदार नागरिक बनण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छित क्षेत्रात काम करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. त्यांनी मुलांना त्यांच्या ध्येयाकडे योग्य हेतूने आणि अपयश किंवा अडथळ्यांना न घाबरता वाटचाल करण्याचे आवाहन केले. संरक्षणमंत्र्यांनी भूतकाळातून धडा घेऊन भविष्यात नवा मार्ग तयार करण्यावर भर दिला. जोपर्यंत आपण प्रयत्न करणे थांबवत नाही, तोपर्यंत कोणताही पराभव अंतिम नसतो, असे ते म्हणाले.

नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’अंतर्गत मुलांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रयत्नांचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले.

शालेय अभ्यासक्रमात लवकरच भारतीय सैनिकांच्या शौर्याचा समावेश

धर्मेंद्र प्रधान यांनी ‘वीर गाथा’ स्पर्धा सुरू केल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांचे आभार मानले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, भारतातील वीरांचा सन्मान करण्यासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव’ यापेक्षा चांगला उत्सव असू शकत नाही. धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, या स्पर्धेने युवापिढीत देशभक्ती रुजेल आणि सर्वात सर्जनशील मार्गांनी त्यांनी शूरांचा आदर केला आहे. या उपक्रमांतर्गत मिळालेल्या प्रमाणपत्रांसाठी शैक्षणिक क्रेडिट देण्यासाठी शिक्षण मंत्रालय लवकरच संस्थात्मक यंत्रणा विकसित करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शिक्षण मंत्र्यांनी पुढे माहिती दिली की, शिक्षण मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून सैनिकांचे शौर्य आणि भारतातील शौर्यगाथा यांचा शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केला आहे. लहानपणापासूनच राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी चांगले नागरिक घडविण्याचे काम करेल. त्यांनी सैनिकांच्या सन्मानार्थ स्पर्धेचे नाव बदलून ‘सेना सुपर 25’ असे सुचवले.

यावेळी सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र यादव यांनी कारगिल युद्धाची त्यांची वास्तविक जीवन कथा सांगितली जिथे त्यांनी सर्व अडचणींवर मात केली आणि टायगर हिल ताब्यात घेण्यात भूमिका बजावली. भारताच्या ऐतिहासिक विजयात हा टर्निंग पॉइंट ठरला. वैयक्तिक सुरक्षेची चिंता न करता निःस्वार्थपणे मातृभूमीची सेवा करणाऱ्या शूर सैनिकांकडून प्रेरणा घेण्याचे त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिले.

काय आहे ‘वीरगाथा प्रोजेक्ट’

‘वीर गाथा प्रोजेक्ट’चे आयोजन केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे, शिक्षण मंत्रालय आणि माय गव्ह ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने केले गेले. शौर्य पुरस्कार विजेत्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांची महती सांगण्यासाठीच्या विविध स्पर्धां घेतल्या गेल्या. कविता, परिच्छेद लिखाण, निबंध, चित्रे आणि इंटरॅक्टिव्ह मल्टीमीडिया व्हिडिओ अशा वेगवेगळ्या विभागात विद्यार्थी आपले कौशल्य दाखवू शकले. यामध्ये तिसरी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रोजेक्टमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न शाळांव्यतिरिक्त, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले.

वीरगाथा प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शौर्यासाठी पदके आणि सन्मान मिळालेल्या वीरांच्या जीवन आणि त्यागावर एक प्रोजेक्ट तयार केला. हा प्रोजेक्ट कविता, लेख, चित्रे, व्हिडिओसह मल्टी मीडिया सादरीकरणाच्या स्वरूपात होता. यातून 25 प्रोजेक्ट निवडले गेले आणि त्यांना संरक्षण मंत्रालयाकडून प्रत्येकी 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले गेले. त्याच्या विजेत्यांना सरकारी खर्चाने, विमानाने दिल्लीला आमंत्रित देखील केले गेले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
Next Post

प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईत निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निसर्ग मित्र समितीतर्फे फिरोज शेख यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार प्रदान

January 2, 2021

जळगाव जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

December 23, 2021

जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिट ; केळी व मका पिकांचे मोठे नुकसान, पालकमंतत्र्यांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश

April 14, 2025

मुंबई आझाद मैदानावरील २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना केले मेल

January 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group