चोपडा (प्रतिनिधी) पर्यावरण वाचविण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील उर्वेश साळुंखे यांने एक सुंदर उपक्रम सुरू केला आहे. पर्यावरणा विषय नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने उर्वेशने जागृतीसाठी सायकलवारी सुरु केली आहे. या उपक्रमांची सुरूवात लासूर गावातून सुरूवात केली. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होतांना दिसत असल्यामुळे उर्वेशने ‘पर्यावरण वाचवा’ ही मोहीम हातात घेतली आहे.
उर्वेशने आपल्या सायकलच्या पुढच्या बाजुस ‘राष्ट्रवादी हात, पर्यावरणाला साथ’, अशा प्रकारचे संदेश देणारे बॅनर लावले आहे. ‘पर्यावरण वाचवूया, हेच अभियान राबवू या’, असे ब्रिद वाक्य तयार करून आपल्या अंगात घातलेल्या डिजिटल बॅनरवर लिहिले आहे. उर्वेशची पर्यावरण जागृतीसाठी सायकलवारी रस्त्याने जातांना पाहून सर्व नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
पर्यावरण ऱ्हासमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याची नितांत गरज आहे. हे सर्व लक्षा घेता उर्वेश साळुंखे यांनी पर्यावरण वाचवा ह्या मोहीमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेमध्ये उर्वेस साळुंखे यांनी आपल्या अंगात अनोख्या पद्धतीचे बॅनर परिधान केले आहे. या बॅनरमध्ये पर्यावरण वाचवा, हेच अभियान राबवा, पर्यावरणाची रक्षा हीच आपली आणि संपूर्ण जगाची सुरक्षा, झाडे लावा झाडे वाचवा, वृक्षतोड करू नका आपले जीवन धोक्यात टाकू नका, पाणी आडवा पाणी जिरवा, आपले मोलाचे जीवन वाचवा, स्वच्छता शिका आणि आपले मोलाचे मानवी जीवन वाचवा, आता करा एकच काम बीडी सिगारेट विमल तंबाखूला राम राम, असे मुद्दे बॅनर व प्रसिद्ध पत्रकावर नमूद केले आहे. या उपक्रमाला उर्वेश साळुंखे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.













