धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या वतीने दि.13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट च्या दरम्यान स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कालावधी नगरपालिका प्रशासन मार्फत विविध कार्यक्रम प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले होते. या कालावधीत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गला नुकतेच सन्मान पत्र प्रधान करण्यात आले. यावेळी विशेष कार्य करणारे आरोग्य विभागाचे निलेश वाणी, महेश चौधरी, गोपाल चौधरी यांचा विशेष प्राविण्य देऊन श्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धरणगाव शहरात मुख्य चौकात 100 फुटी तिरंगा फडकवण्यात आला होता. तसेच शाळा कॉलेज गीत गायन सांस्कृतिक कार्यक्रम न. पा.तर्फे आयोजित करण्यात आले होते. धरणगाव नगरपालिकाचे मुख्यधिकारी श्री. पवार यांनी कर्मचारी यांचा भविष्यात उत्साह वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व उत्साह होता. यावेळी कार्यालयीन अधिक्षक संजय मिसर, लेखाधिकारी ज्ञानेश्वर दिघोडे, बांधकाम अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा चव्हाण, आस्थापना प्रमुख योगाराज तळेराव हे उपस्थित होते. तर कार्यक्रमचे सूत्रसंचालन करनिरीक्षक प्रणव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू माळी, गणेश पाटील, अशोक चव्हाण, संजय शुक्ला, जयेश भावसार, किशोर खैरनार, नारायण माळी, तुषार सोनार, रितेश जोशी, मुजमिल शेख, अण्णा महाजन, रामकृष्ण महाजन, हनिफ शेख आदी कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.