धरणगाव (प्रतिनिधी) संरक्षक भिंती व रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा माजी नगरसेवक भागवत चौधरी यांनी धरणगाव मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला होता. पण, त्यासंदर्भात कारवाई झाली नसल्यामुळे माझी नगरसेवक भागवत चौधरी हे आजपासून उपोषणाला बसले आहे.
धरणगाव नगरपालिका हद्दीतील चोपडा रस्त्यापासून ते महादेव मंदिरा पर्यंत झालेल्या संरक्षक भिंती तसेच रस्त्यांचे बांधकाम नित्कृष्ट झाल्याचे अनेकवेळा तक्रारी केलेल्या आहेत. तसेच केलेल्या मागणीनुसार थर्ड पार्टी ऑडिट करतांना तक्रारकर्ते यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे सदर थर्ड पार्टी अहवालात त्रुटी आढळून आल्याचे नमूद केले आहे. असे असताना आपण संबंधितांवर गुन्हे दाखल न करता संबंधितांना पाठीशी घालत असून लोक निधीचा अपव्यय करीत असून आपण आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्यामुळे भागवत चौधरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ उपोषणाला बसले आहे. त्यांच्या या उपोषणाला धरणगाव शहरातील नागरिक वाढता प्रतिसाद मिळत आहे.