मुंबई (वृत्तसंस्था) मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज एक ट्वीट सूचक विधान केले आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मलिकांना डिवचले आहे. नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा सोमय्या यांनी करून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे.
किरीट सोमय्यांनी शनिवारी नवाब मलिक यांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा त्यांनी केला. मलिक हे आत्ता ट्वीट करतात. कारण त्यांना भीती वाटतेय. पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला आहे. ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली आहे. जमिनी ढापल्या आहेत. त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे. आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार. घोटाळा बाहेर आलाय म्हणून मलिक हात पाय मारत आहेत. पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही. चोरी केली तर शिक्षा होणारच, असा दावाही सोमय्यांनी केला.
दरम्यान, मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्वीट केल्याने सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपल्या ट्वीटमध्ये मलिकांनी सूचक भाष्य केले आहे. ते म्हणतात, साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.