जळगाव (प्रतिनिधी) केळी पीक विम्याचे निकष बदलल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं आता सोपं झालं आहे. यावरून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरुच आहे. ना. गुलाबराव पाटील मला वडीलांसारखे आहेत. त्यांनी लेकीवर टीका न करता तीच्या कामाचे कौतुक करावे, असे खा. रक्षाताई खडसेंनी म्हंटल होते. लेक आहे, तर लेकीनेही बापाच्या हद्दीत रहावे, असा टोला ना. पाटील यांनी खा. खडसेंना लगावला.
यासंदर्भात ना. पाटील यांच्याशी संपर्क केल्यावर, त्याला उत्तर देताना आज ते म्हणाले, ‘लेक आहे, तर लेक आहेच. तीने बापाच्या कामाचा विचार करावा. लेकीने बापाच्या हद्दीत रहावे’ असे म्हटले.
केळी पीक विमा योजनेचे निकष सरकारने बदलले. याचे श्रेय घेण्यावरून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्यात शाब्दीक शरसंधान झाले होते. खासदार खडसे यांनी हे निकष केंद्रातील भाजप सरकारने बदलले असा दावा केला होता. मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मात्र हे निकष राज्य सरकारमुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बदलण्यात आले, असा दावा केला होता. यासंदर्भात जिथे लग्न दिसले, तिथे बाजा वाजविण्यास रक्षाताई खडसे हजर होतात’ असा टोला ना. पाटील यांनी लगावला होता.
यावर खासदार खडसे यांनी मी गेल्या अनेक दिवसांपासून मुलांसोबत बाहेरगावी होते, या बाबत मी कोणतेही श्रेय घेतले नाही. माझे कुठेही वक्तव्य नाही, या मध्ये कोणाचेही श्रेय नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मांडला, त्यामुळे राज्य सरकारला निकष बदलावे लागेल. मात्र, यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर टीका करावी याचे मला आश्चर्य वाटत आहे, ते मला वडीलांसारखे आहेत मुलगी म्हणून त्यांनी या मुद्द्यावर चांगले काम केल्याचे माझे कौतुक करून प्रोत्साहन देण्याची गरज होती