TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाणी टंचाईच्या बाबतीत पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का ?

जाणून घ्या....कोण बोलतंय लबाड ?...आणि कोण बनवतेय धरणगावकरांना उल्लू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालिकेच्या कर्मचारी बुधवारी काही ठराविक पत्रकारांना धावडे येथील पाणीपुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनला भेट देण्यास घेऊन गेले होते. त्यानंतर धरणगावकरांची दिवाळी पाण्याविनाच होणार, अशी बातमी काही दैनिकांमध्ये प्रकाशित झाली. अर्थात पत्रकार मित्रांनी प्रत्यक्ष पाहणीत जे बघितलं असेल किंवा त्यांना जे सांगण्यात आलं तेच त्यांनी आपल्या बातमीत प्रकाशित केलं असेल. मग रात्रीतून असा काय चमत्कार झाला की, अचानक धावडे येथून पाणी धरणगावला पोहचले. रात्रीतून काय चमत्कार घडला ?, दिवाळीनंतर येणारे पाणी रात्रीतून धरणगावात कसे आले?

पाणी टंचाई कृतीम नव्हे…तर पालिका प्रशासन निर्मित?

READ ALSO

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 9 जून 2025 !

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

पाणी टंचाई कृतीम नव्हे…तर पालिका प्रशासन निर्मित होती का?, यात पालिकेतील कर्मचारी, अधिकारी काही राजकारण करत आहेत का?, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी टंचाईच्या बाबतीत पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागणार असून, धरणगावकरांची दिवाळी यामुळे पाण्याविना साजरी होणार असा अंदाज धावडे येथील पाणीपुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनला भेट देण्यास पत्रकार मित्रांनी आपल्या बातम्यांमधून व्यक्त केला होता.

अर्ध्या धरणगावची दिवाळी पाण्याविनाच जाणार?

बरं पालिका प्रशासन जरी उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असं सांगत असले तरी शहरात साधारण ५ झोन व १८० उपझोन आहेत. सर्व झोनला पाणीपुरवठा होण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा दिवस लागणार आहेत. त्यामुळे उद्यापासून पाणी सुरु झाले तरी अर्ध्या धरणगावची दिवाळी पाण्याविनाच जाणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काल कोण लबाड बोलत होते ?, आणि आज कोण धरणगावकरांना उल्लू बनवतेय?, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

रात्रीतून काय चमत्कार घडला

धावडे येथील तापी नदीपात्रात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी आहेत. मात्र, त्या दोन्ही विहिरींना जोडणारा पाइप आतूनच गाळाने पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे नदीतून पाणी पंपिंग स्टेशनच्या विहिरीवर येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा करणारे १३५ एचपीचे पंप बंद आहे. पंप चालू स्थितीत असले तरी नदीतून पाणीच येत नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. मग रात्रीतून असा काय चमत्कार घडला की, १३५ एचपीचे पंप सुरु झालेत आणि पाणी पुरवठा सुरळीतही झाला.

पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का?

थोडक्यात पाणी टंचाई कृतीम नव्हे…तर पालिका प्रशासन निर्मित होती का?, असा प्रश्न अनेकांना यामुळेच पडला आहे. पालिकेतील कोणते अधिकारी आणि कर्मचारी राजकारण करू पाहताय?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अगदी कालपर्यंत दिवाळीनंतर सुरळीत होणारी पाणी पुरवठ्याची स्थिती रात्रीतून बदलली. नुसती बदलली नाही तर, उद्यापासून पाणी पुरवठा देखील करणार आहे म्हणे. जिव्हाळ्याच्या प्रश्नावर पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का?, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

पालिकेचे अधिकारी, कर्मचारी राजकारण करताय का?

पाणी पुरवठा उद्यापासून सुरळीत झाल्यास धरणगावकरांना आनंदच होईल. परंतू नदीला पाणी याच वर्षी आले का?. पाईप लाईनमध्ये गाळ याच वर्षी साचला का?…तर याचं उत्तर नाही असंच आहे. मग पावसाळा लागण्यापूर्वी पालिका प्रशासने उपाय योजना का केल्या नाहीत?. पालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी कार्यकाळ संपल्यानंतरही इथंच ठाण मांडून आहेत. त्यामुळे ते कुणाचं तरी राजकारण खराब करण्यास इच्छुक आहेत?, अशी जोरदार चर्चा गावात सुरु आहे. अगदी जळगावचे पत्रकार आज धरणगाव येतात आणि कधी नव्हे ते मुख्याधिकारी पण आज पालिकेत हजर राहतात?, याला निव्वळ योगायोग कसा म्हणता येईल?.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 9 जून 2025 !

June 9, 2025
जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
सामाजिक

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य 8 ते 14 जून 2025 !

June 8, 2025
चाळीसगाव

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 जून 2025

June 7, 2025
धरणगाव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

June 6, 2025
Next Post

मोठी बातमी : डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली ; जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम.राजकुमार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सार्वजनिक सुट्टी हा कायदेशीर अधिकार नाही : मुंबई उच्च न्यायालय

January 7, 2022

दिवसभर शेतात काम केलं, घरी परताना घडलं भयंकर ; ट्रॅक्टर-ट्रॉली कालव्यात कोसळून चार महिलांचा बुडून मृत्यू !

June 25, 2023

नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा : रोहिणीताई खडसे !

May 25, 2024

कोरोना काळात जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? : तीरथ सिंह रावत

March 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group