TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळी रानभाजी महोत्सव !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2023
in कृषी, बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्यांचे व तृणधान्यांचे विशेष महत्त्व आहे असे मत तालुका कृषि अधिकारी सी. जे. पाडवी यांनी व्यक्त केले, तसेच सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन आरोग्यास वरदान ठरेल हे सांगत रानभाज्यांचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची गरज असल्याचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी म्हटले. बोदवड महाविद्यालयात पावसाळी रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

महोत्सवाचे उद्घाटन बोदवड येथील कृषि विभागाचे तालुका अधिकारी सी. जे. पाडवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. पावसाळ्यातील सर्वात मोठं आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानभाज्या. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या तसेच अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्या म्हणजे हिरवं धनच .या भाज्या स्वादिष्ट तर असतातच त्याचबरोबर आरोग्यवर्धक, शक्तीवर्धक व त्रिदोष हारक देखील असतात. सुदृढ आरोग्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरते. म्हणूनच आपल्या परिसरातील विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचा उपयोग व गुणधर्मांची माहिती सर्वांना व्हावी तसेच अनेक दुर्मिळ व लुप्त होत असलेल्या रानभाज्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने गो ग्रीन क्लब अंतर्गत दरवर्षी “पावसाळी रानभाज्या महोत्सवाचे” आयोजन करण्यात येते, असे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गीता पाटील यांनी सांगितले.यावर्षी देखील शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी वनस्पती शास्त्र विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी ,उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी , विभागाचे . पंकज माळी, एन.पी.महाजन, श्री. व्ही. एच. भोसले व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. रानभाज्यांच्या माहितीसाठी पोस्टर्स लावले होते. तसेच प्रत्येक भाजीचे नाव त्यांचे महत्त्व व पाककृती क्यू आर कोडसह उपलब्ध करून देण्यात आली होती. याचबरोबर रानमेवा पाककृती स्पर्धा देखील घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी विद्यार्थ्यांनी कुरडू, मायाळू ,घोळ ,कटुरले, अंबाडी, लाल माठ ,तांदुळजा, केना , फांग ,अळू ,शेवगा अशा अनेक रानभाज्यांच्या विविध पाककृतींनी सर्वांचे लक्ष वेधले. सर्वांनी व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट देऊन रानभाज्यांची चव चाखून माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध पाककृतींचे परीक्षण ति.र. बरडीया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना काठोके व रोझ पेटल शाळेच्या सौ. रेखा वेरुळकर यांनी केले. प्रथम क्रमांक कु. करिश्मा तेली हिने तर द्वितीय क्रमांक कु. मोहिनी पाटील व उज्वला चौधरी ह्यांनी तर कु. अपूर्वा पाटील हीने तृतीय क्रमांक पटकावला . अथर्व काजळे याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये तृणधान्य सेवनासंबंधी जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्यांचे वाटप देखील केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रत्ना जवरास ,डॉ. मनोज निकाळजे ,डॉ. चेतनकुमार शर्मा, डॉ. नरेंद्र जोशी, सौ. वैशाली अहिरे, संदीप बरडे, कंचन दमाडे, डॉ. रुपेश मोरे, नितेश सावदेकर, डॉ हेमलता कोटेचा, वंदना नंदवे, रुपाली चौधरी,श्री.आठवले, श्री. यादव, निलेश महाजन, विशाल जोशी, समीर पाटील, जितेंद्र बडगुजर , विजू धोबी ,अतुल पाटील , नामदेव बडगुजर , वैभव माटे , या सर्वांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रथमच महिलेविरुद्ध कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप !

October 14, 2020

काय सांगता ! हिमालयात सापडली कोरोनाला संपवणारी ‘संजीवनी’

January 18, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २१ जून २०२३ !

June 21, 2023

एरंडोल – धरणगाव शिक्षक पतपेढीच्या चेअरमनपदी धनराज मनोरे यांची बिनविरोध निवड

March 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group