TheClearNews.Com
Wednesday, July 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळी रानभाजी महोत्सव !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2023
in कृषी, बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्यांचे व तृणधान्यांचे विशेष महत्त्व आहे असे मत तालुका कृषि अधिकारी सी. जे. पाडवी यांनी व्यक्त केले, तसेच सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन आरोग्यास वरदान ठरेल हे सांगत रानभाज्यांचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची गरज असल्याचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी म्हटले. बोदवड महाविद्यालयात पावसाळी रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

महोत्सवाचे उद्घाटन बोदवड येथील कृषि विभागाचे तालुका अधिकारी सी. जे. पाडवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. पावसाळ्यातील सर्वात मोठं आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानभाज्या. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या तसेच अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्या म्हणजे हिरवं धनच .या भाज्या स्वादिष्ट तर असतातच त्याचबरोबर आरोग्यवर्धक, शक्तीवर्धक व त्रिदोष हारक देखील असतात. सुदृढ आरोग्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरते. म्हणूनच आपल्या परिसरातील विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचा उपयोग व गुणधर्मांची माहिती सर्वांना व्हावी तसेच अनेक दुर्मिळ व लुप्त होत असलेल्या रानभाज्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने गो ग्रीन क्लब अंतर्गत दरवर्षी “पावसाळी रानभाज्या महोत्सवाचे” आयोजन करण्यात येते, असे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गीता पाटील यांनी सांगितले.यावर्षी देखील शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी वनस्पती शास्त्र विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

READ ALSO

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी ,उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी , विभागाचे . पंकज माळी, एन.पी.महाजन, श्री. व्ही. एच. भोसले व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. रानभाज्यांच्या माहितीसाठी पोस्टर्स लावले होते. तसेच प्रत्येक भाजीचे नाव त्यांचे महत्त्व व पाककृती क्यू आर कोडसह उपलब्ध करून देण्यात आली होती. याचबरोबर रानमेवा पाककृती स्पर्धा देखील घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी विद्यार्थ्यांनी कुरडू, मायाळू ,घोळ ,कटुरले, अंबाडी, लाल माठ ,तांदुळजा, केना , फांग ,अळू ,शेवगा अशा अनेक रानभाज्यांच्या विविध पाककृतींनी सर्वांचे लक्ष वेधले. सर्वांनी व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट देऊन रानभाज्यांची चव चाखून माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध पाककृतींचे परीक्षण ति.र. बरडीया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना काठोके व रोझ पेटल शाळेच्या सौ. रेखा वेरुळकर यांनी केले. प्रथम क्रमांक कु. करिश्मा तेली हिने तर द्वितीय क्रमांक कु. मोहिनी पाटील व उज्वला चौधरी ह्यांनी तर कु. अपूर्वा पाटील हीने तृतीय क्रमांक पटकावला . अथर्व काजळे याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये तृणधान्य सेवनासंबंधी जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्यांचे वाटप देखील केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रत्ना जवरास ,डॉ. मनोज निकाळजे ,डॉ. चेतनकुमार शर्मा, डॉ. नरेंद्र जोशी, सौ. वैशाली अहिरे, संदीप बरडे, कंचन दमाडे, डॉ. रुपेश मोरे, नितेश सावदेकर, डॉ हेमलता कोटेचा, वंदना नंदवे, रुपाली चौधरी,श्री.आठवले, श्री. यादव, निलेश महाजन, विशाल जोशी, समीर पाटील, जितेंद्र बडगुजर , विजू धोबी ,अतुल पाटील , नामदेव बडगुजर , वैभव माटे , या सर्वांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025
कृषी

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

June 6, 2025
कृषी

अवकाळी पावसानंतर उघडीप मिळाल्याने खरीप हंगामाला वेग

June 2, 2025
भुसावळ

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

June 1, 2025
जळगाव

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या : अतुल जैन

May 18, 2025
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील 10 वी, 12 वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

May 16, 2025
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रथमच महिलेविरुद्ध कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ! गेल्या २४ तासांत आढळले ४,१४,१८८ कोरोनाबधित

May 7, 2021

शाळेतून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला टिप्परने चिरडले !

October 27, 2023

शिवसेना बंडखोर आमदार टेन्शनमध्ये ; पक्षांतरबंदी कायद्यामुळे धाकधूक वाढली !

June 26, 2022

कोल्हापूर हादरलं ! दोन वर्षे लैंगिक शोषण करत दोनदा घडवला गर्भपात

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group