TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशभरात लोकांचे हाल होत असताना संघ आणि भाजपने बघ्याची भूमिका घेतली : प्रकाश आंबेडकर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) कोरोनानंतर लॉकडॉऊन लावल्याने लोकांचे होत हाल होते. असे होत असताना संघप्रमुख डॉ. मोहन भागवतंनी पंतप्रधानांना परिस्थितीची जाणीव करुन दिलीच नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. देशभरात लोकांचे हाल होत असताना संघ आणि भाजपने बघ्याची भूमिका घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेमध्ये माणसाला किंमत नाही. सोबतच आरएसएस-भाजपच्या शासनात माणूस आणि माणुसकीला किंमत नसल्याचा टोला, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी लगावला. ते ऑनलाईन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’च्या कार्यक्रमात बोलत होते.

 

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

या भाषणात अनेक मुद्द्यांवरुन प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. देशात कोरोनाची स्थिती गंभीर होण्यासाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचं आंबेडकर म्हणाले. मोदींनी स्वत:चा ‘टीआरपी’ वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना देशात आणत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम केल्याचं ते म्हणाले. येथूनच देशात कोरोनाचा फैलाव व्हायला सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केंद्र सरकारवर केला आहे. मोदींनी देशवासियांना कोरोनाची भीती दाखवली. मोदींनी कोरोनाशी लढायचं केलेलं आवाहन ठीक होतं. मात्र, हे करताना सहा महिन्यांपेक्षा अधिक दीर्घकालीन लॉकडॉऊनची आवश्यकता होती का?, असा सवाल आंबेडकरांनी पंतप्रधानांना केला. लॉकडॉऊन’ काळात मोदींनी स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल थांबवण्यासाठी देशभरात ‘कम्युनिटी किचन’ची संकल्पना का राबविली नाही?, असा प्रश्नही आंबेडकरांनी केंद्र सरकारला विचारला.

 

प्रकाश आंबेडकरांनी केंद्राच्या तिन्ही कृषी विधेयकांवरही जोरदार टीका केली आहे. किमान आधारभूत मूल्याबाबत या विधेयकात काहीच ठोस तरतूद नसल्याचं ते म्हणाले. या विधेयकाला काही राज्यांनी टोकाचा विरोध केला आहे. कृषी विधेयकात संशोधन करणार पंजाब आणि कृषी विधेयक नाकारणाऱ्या राज्य सरकारांविरोधात ५६ इंचांची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम ३५६ वापरत बरखास्त करणार का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या क्षेत्राचं खाजगीकरण चालवल्याचं धोरण चुकीचं असल्याचं आंबेडकर म्हणाले. केंद्रातील कंगाल सरकार देशाची संपत्ती विकायला निघाल्याचं ते म्हणाले. हे खाजगीकरणाचं धोरण केंद्र सरकार अंबानी, अदाणींसाठी राबवत असल्याचा त्यांनी आरोप केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक घट; ३ महिन्यांनी मिळाला 'हा' दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फेसबुकवरील ख्यातनाम कुबेर समूहाला ‘कोवीड योद्धा’ पुरस्कार जाहीर !

November 12, 2021

कठोरा येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनची आढावा बैठक संपन्न

May 24, 2022

जिल्ह्यात 20 ऑक्टोबरपर्यंत कलम 144 (1) (2) लागू

October 8, 2020

बोदवड पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

February 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group