चोपडा (प्रतिनिधी) भारताच्या पुरातन वैचारिक, साहित्य,संस्कारांवर शेकडो वर्षांपासून काही शक्तींनी घाला घालण्याचे कृत्य केले.त्याचा परिणाम साहित्य निर्माण करतांना होतांना दिसला. त्यामुळे अखिल भारतीय साहित्य परिषद सक्रीय झाली आहे.परिषदेला राष्ट्र प्रथम आणि पारंपारिक वैचारिक ठेवा जपून समाज निर्मितीला हातभार लावण्याचे कार्य करायचे आहे.त्यामुळे देवगिरी प्रांतात प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीय विचारधारा जाणणारे,साहित्य,संस्कृतीसाठी झटणारे कार्यकर्ते सोबत घेवून परिषदेच्या शाखा निर्माण केल्या जात आहेत असे प्रतिपादन अ.भा.साहित्य परिषदेचे देवगिरी प्रांताचे संघटन सचिव शशीकांत घासकडबी यांनी येथे केले.
नगर वाचन मंदिराच्या सभागृहात झालेल्या बैठकिचे अध्यक्षस्थानी प्रांताचे कार्याध्यक्ष प्रा.डॅा.पुरूषोत्तम पाटील होते.प्रास्ताविक जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकांत नेवे यांनी केले.याप्रसंगी प्रांत कार्याध्यक्ष प्रा.डॅा.पाटील,गोविंद गुजराथी यांनी समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.डॅा.पाटील व घासकडबी यांचे स्वागत अ.भा.साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक सोमाणी,कार्याध्यक्ष गोविंद गुजराथी यांनी केले.तसेच प्रांत पदाधिका-यांचे हस्ते नवनियुक्त कार्यकारणीतील पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष- नरेंद्र भावे, उपाध्यक्ष-वैद्य प्राजक्ता महाले, सचिव- प्रभाकर महाजन, संघटन मंत्री- संजिव शेटे, प्रसिध्दी प्रमुख- उमेश नगराळे, कार्यकारणी सदस्य-डॅा.किशोर पाठक, तुषार लोहार, प्रशांत गुरव,प्रिती सरवैय्या पाटील, सल्लागार- प्रा.एस.टी.कुळकर्णी आणि महेशकुमार शर्मा,मुख्याध्यापक विलास पाटील,वैद्य शैलेंद्रसिह महाले, वाडे,ग्रंथपाल गोपाळ दांडेकर,रमेश सोनार आदि उपस्थित होते.सुत्रसंचालन श्रीकांत नेवे यांनी केले.आभार सचिव प्रभाकर महाजन यांनी मानले.