TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यपालांनी स्वत:चे पुरते वस्त्रहरण करून घेतलेय : शिवसेना

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पायंडा पाडला आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाट्य घडवण्यात आले त्याची संहिता भाजप भाजप कार्यालयात लिहली गेली आणि त्या नाट्याचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले आहे. या सगळ्या प्रकारात राज्यपालांनी स्वत:चे पुरते वस्त्रहरण करून घेतल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

सामनाच्या पुढील लेखात म्हटले आहे की, राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष जे बार उडवत आहे, ते फुसकेच ठरत आहेत. राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे १७० आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना सुनावल्याची माहिती समोर येत आहे. राज्यपालांनी गेल्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र आणि अभिभाषणातील गोंधळाच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडीच्या मंत्र्यांसमोर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. माझे अभिभाषण सुरू असताना तुमच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्या, असे राज्यपालांनी म्हटले.

भाजपला दाऊदच्या नावाने राजकारण करायचे आहे. त्यासाठी विधिमंडळात घटनेचा बळी देण्यात आला. राज्यपालांनी त्यास साथ द्यावी, हे देशाचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्त्व करतात. तसेच शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात. सत्ता गेली याचा इतका राग इतिहासात कोणी केला नसेल, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

अलीकडे लोक खाल्ल्या मिठाला जागताना दिसत नाहीत. पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जुन्या पक्षाच्या मिठास जागून महाविकासआघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले. त्यांनी जय हिंद किंवा जय महाराष्ट्रही म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. यापूर्वी अनेक राज्यांच्या विधानसभेत राज्यपालांच्या भाषणादरम्यान अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यामुळे कोणतेही राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून गेले नव्हते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

या अल्लाह पुरे आलम मे अमन पैदा कर ; युक्रेन- रशिया युद्ध थांबविण्यासाठी विशेष प्रार्थना व निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दापोरी बु. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता पाटील यांची निवड

February 13, 2021

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले ६३१ बाधित ; जामनेरात सर्वाधिक १४५ रुग्ण !

May 16, 2021

नशिराबाद येथील हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात !

November 9, 2022

जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

August 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group