TheClearNews.Com
Thursday, January 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करणार : जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना वरदान ठरणारा तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प, पाडळसे हा लवकरच पूर्ण होऊन याठिकाणी येत्या अडीच-तीन वर्षात पाणीसाठा होण्यास सुरुवात होईल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मंत्री पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील मौजे पाडळसे गावाजवळील तापी नदीवर निम्न तापी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अनिल पाटील, आमदार लताताई सोनवणे, माजीमंत्री एकनाथराव खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, साहेबराव पाटील, प्रा. शरद पाटील, मनीष जैन, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बी. एस. स्वामी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य अभियंता एम. एस. आमले, रुपालीताई चाकणकर, पुष्पलताताई पाटील, जयश्रीताई पाटील, नाशिक येथील मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेचे मुख्य अभियंता मंदाळे, अधिक्षक अभियंता पी. आर. मोरे, राजेश मोरे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, कार्यकारी अभियंता श्रीमती रजनी देशमुख, हेमंत खोरगडे आदि उपस्थित होते.

READ ALSO

जीवाचे रान करणारा माणूस हरवला

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

ना. पाटील पुढे म्हणाले की, धरणाच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे, त्यानंतर पुढील दोन टप्प्यात धरणाच्या कॉक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तापी नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे महाराष्ट्राचे वाट्याचे पाणीही मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आमदार अनिल पाटील यांनी या प्रकल्पाच्या क्षेत्रातील तालुके हे अवर्षणप्रवण तालुके आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पास चालू अर्थसंकल्पात किमान २५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची व या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत करण्याची विनंती जलसंपदामंत्र्यांना केली. माजीमंत्री खडसे म्हणाले की, या प्रकल्पामुळे सहा तालुक्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून शेतीसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असल्याने हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील वरखेड लोंढे धरण क्षेत्रास शासनाने वाळूक्षेत्र घोषित केले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा होणार असल्याने या वाळू विक्रीतून मिळणारा निधी हा जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण करण्यास वापरण्याची सुचनाही यावेळी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जलसंपदामंत्र्यांनी या प्रकल्पाच्यास्थळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची स्थिती, तांत्रिक मुद्दे, प्रकल्पातील अडचणी आदिंबाबत माहिती करुन घेतली व सकारात्मक चर्चा केली. या प्रकल्पाविषयीची सविस्तर माहिती कार्यकारी संचालक स्वामी यांनी दिली. तर प्रकल्पाचे सादरीकरणात या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, पारोळा, चोपडा व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व धुळे तालुक्यातील २५६५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून प्रकल्पाचे ७० टक्के मातीकाम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर ५४३.६७ कोटी रुपये खर्च झाला असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २२०७.४३ कोटी रुपयांची आवश्यक असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्रीमती रजनी देशमुख यांनी दिली. त्यानंतर पाटील यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन झालेल्या कामाची पाहणी केली. यावेळी पाडळसे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी यांनीही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती जलसंपदामंत्र्यांना निवेदनाद्वारे केली. कार्यक्रमास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिसरातील गावातील शेतकरी, नागरीक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जीवाचे रान करणारा माणूस हरवला

January 28, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : प्रकाश वाणीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कौशल्यातून रोजगाराकडे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे शुक्रवारी आयोजन

July 15, 2021

होय माझी चूक झाली, कायद्यानुसार माझ्यावरही नक्की कारवाई करा : इम्तियाज जलील

March 31, 2021

महाविकास आघाडीची महिला मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार आहेत का? : अनिल परब

November 21, 2020

धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

June 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group