जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बिलवाडी येथे एका तरुणाने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, गोपाल राजेंद्र पाटील (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गोपाल याने रविवारी सायंकाळी ज्या शेतात विष प्राशन केले, ते शेत त्याचे काका प्रकाश गना पाटील यांच्या मालकीचे आहे. दिवसभर शेतात असतानाच सायंकाळी पिकांवर फवारणी करण्याचे औषध त्याने प्राशन केले. नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. सोमवारी शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.