जामनेर (प्रतिनिधी ) । तालुक्यातील टाकरखेडा जिल्हा परिषद मराठी शाळेत बाल-आनंद मेळावा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ तथा पोलीस पाटील समाधान पाटील हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाल-आनंद मेळाव्याचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांनी बाल-आनंद मेळावा करण्या मागचा उद्देश पालकांना सांगितला की, विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान प्राप्त होते. तसेच नफा- तोट्याची संकल्पना समजते. खरेदी, विक्री, घेणे-देणे, खाद्य पदार्थांची नावे, चव,वजन, पैशांची देवाण-घेवाण इत्यादी गणिती प्रक्रियांचे ज्ञान प्रत्यक्षपणे बाल-आनंद मेळाव्यातून कळते. मेळाव्यात गुलाब जाम, चकल्या, कांदे भजी, भुईमुगाच्या शेंगा, खमंग, पोहे, साबुदाणा वडे, इडली सांबार, आप्पे, ढोकळे, हरभरा उसळ, पाणीपुरी इत्यादी स्टॉल विद्यार्थ्यांनी मांडली. विशेष बाब म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी पैसे न घेता मोफत “दादा का स्टॉल राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की” हा स्टॉल मांडण्यात आला. सदर मेळाव्यात विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी खाद्यपदार्थांचा मनसोक्तपणे आनंद घेतला. शेकडो रुपयांची खाद्यपदार्थांची खरेदी – विक्री झाली. या मेळाव्यास पोलीस पाटील समाधान मुरलीधर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, अर्जुन पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, उपाध्यक्ष रूपाली आगळे, सदस्य शिवाजी डोंगरे, पालक निवृत्ती आगळे, आत्माराम सुरळकर, पुंडलिक केणे, किशोर भोई, लक्ष्मी भोई, दिपाली पाटील, सुनिल दांडगे,सुभाष भोई, विशाल भोई, नितीन भोई, , केशरबाई लोहार, नितीन भोई, रविंद्र दांडगे, रतिलाल भोई, रघुनाथ आगळे, ईश्वर भोई, रणधीर पाटील इत्यादी पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षक देवाजी पाटील यांनी केले व आभार जयंत शेळके यांनी मानले. बाल – आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी रविंद्र चौधरी, जयश्री पाटील, छाया पारधे, शांताराम पाटील, रामेश्वर आहेर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.