चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मजरेहिंगोणा ग्रामपंचायच्या तत्कालीन सरपंच,उपसरपंचांसह सदस्य आणि तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील ग्रामपंचायतीत पंचायतराज अंतर्गत तत्कालीन सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी सन २०२२-२३ मध्ये पदावर कार्यरत असताना त्यांनी पोपट यादव पाटील पिंताबर दौलत धिवर, उत्तम बाबुराव पाटील, ज्ञावेश्वर सिताराम पाटील हे अनुक्रमे सन २००९,२०१३,२०१४,२०१९, मयत झालेले असताना त्यांच्या नावाने खोटे दस्ताएवज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडुन २६ हजार १५७ रुपये काढून शासनाची दिशाभुल करुन शासनाकडून येणाऱ्या रकमेचा स्व:ताच्या फायद्यासाठी अपहार केला.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून कल्पनाबाई जिजाबराव पाटील (वय ५०, सरपंच), नंदकिशोर चिंधु सांगोरे (वय ४८, उपसंरपंच), करुणा रामकृष्ण ईधाटे (वय ३५, घरकाम), मालती भागवत पाटील (वय ३६, सदस्या), आशाबाई नाना भील (वय ५१, सदस्या), साहेबराव छगन पाटील (वय ६८, सदस्य), संगीताबाई छगन पाटील (वय ४२, सदस्या), शांताराम आर पाटील (वय ५८,तत्कालीन ग्रामसेवक, सर्व रा मजरेहिंगोणा ता चोपडा जि जळगाव) यांच्याविरुद्ध भादवी कलम ४०६, ४२०, ४६४, ४६८,४२७, ४७७ (A), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शामकांत बोरसे हे करीत आहेत.