TheClearNews.Com
Sunday, June 29, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मविप्र’वाद : जाणून घ्या…गुन्हा दाखल झाल्यापासून तर आतापर्यंतच्या सर्व घडामोडी !

गिरीश महाजन यांची फिर्याद रद्द करण्याच्या याचिकेचे काय झाले?

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2022
in गुन्हे, जळगाव, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘मविप्र’च्या वादातून अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध ९ डिसेंबर २०२० रोजी फिर्याद दिली होती. याप्रकरणी आज सकाळी कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात येऊन धडकल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने गुन्हा दाखल झाल्यापासून तर आतापर्यंत या गुन्ह्यात नेमक्या कोण कोणत्या घडामोडी घडलाय ते जाणून घेऊ या !

 

READ ALSO

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरुद्ध गुन्हा

मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी २०१८ मध्ये पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी अॅड. विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी माजी मंत्री गिरीश महाजन,सुनील झंवर, रामेश्वर नाईकसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मविप्र’ संस्था काबीज करण्याच्या उद्दिष्टाने संचालकांचे राजीनामे घेण्यासाठी अॅड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली, अशी फिर्याद अॅड. विजय भास्कर पाटील दिली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे या फिर्यातील तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात देण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचा आरोप देखील फिर्यादीत करण्यात आला होता.

 

जानेवारी २०२१ मधेही पुणे पोलिसांचे पथक आले होते जळगावात

 

मविप्र’ संस्थेच्या वादातून ॲड. विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोथरूड पोलिसांचे पथक जानेवारी २०२१ मधेही जळगावात आले होते. त्यात पुणे पोलिसांचे दोन अधिकारी, कर्मचारी अशा चार जणांचा पथकात समावेश होता. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या नावे पत्रव्यवहारची संपूर्ण माहिती मागविली होती. त्यानुसार सन २०१२ पासून तर आजपर्यंतची संपूर्ण माहिती २५ जानेवारीपर्यंत मागविली होती.

 

जिल्हाभरात दाखल गुन्हे, त्याच्या तपासाची स्थितीबाबत पोलीस अधीक्षकांना पत्र

 

या पथकाने गुन्ह्याकामी आवश्यक माहिती मिळावी म्हणून मविप्रसंदर्भात जिल्हाभरात एकत्रित दाखल गुन्हे, त्याचा तपास याबाबत पोलीस अधीक्षकांना पत्र दिले होते. दाखल गुन्हे व शैक्षणिक माहितीसाठी साहाय्यक शिक्षण सहसंचालक सतीश देशपांडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांनाही पत्रव्यवहार करण्यात आला होता.

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्हा उपनिबंधकांनाही पत्र

 

संस्थेचे आर्थिक व्यवहार संचालक मंडळाशिवाय दुसऱ्या गटाच्या नावे करावे म्हणून कोणाचे पत्र होते, याची माहिती घेण्यासाठी मविप्रचे खाते असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही पत्र दिले आहे. सहकार विभागाने निवडणुका घेतल्या होत्या. सहकार कायद्यानुसार निवडणूक केव्हा, कोणत्या कालावधीसाठी घेण्यात आली होती, याबाबत जिल्हा उपनिबंधकांनाही पत्र दिले आहे. मविप्र सरकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून तेथे निवडणुका घेतल्या होत्या, निवडून आलेल्या संचालकांना पदभार दिला होता. असे असताना संचालक मंडळाकडून पदभार काढून सत्ता भोईटे गटाकडे देण्यात आली होती. यात शिक्षण विभागाने दिलेल्या पत्राची भूमिका महत्त्वाची होती.

 

गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने दिला होता दिलासा

पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन वर्षापूर्वीच्या फौजदारी फिर्यादीमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली होती. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद केली आहे, असा युक्तिवाद महाजन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जानेवारीला निश्चित केली होती. तसेच संबंधित फिर्यादीबाबतची कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देशही दिले होते. त्यामुळे ७ जानेवारीपर्यंत महाजन यांच्यासह दोघांविरोधात कठोर कारवाई करु नये असेही आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले होते.

 

काय म्हणणे आहे गिरीश महाजन यांच्या वकिलांचे !

 

गिरीश महाजन यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. केवळ त्यांच्या नावाचा दाखला देऊन धमकावले जात असून तक्रारदाराने खोटी कथा तयार केली आहे, असा दावा महाजन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला आहे. शिवाय गुन्हा तीन वर्षांनी दाखल करण्यात आला. एवढय़ा विलंबाचे कारणही तक्रारदाराने दिलेले नाही. त्यामुळे तो रद्द करण्याची मागणी महाजन यांच्यातर्फे करण्यात आली आहे. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद देण्यात आली, असा युक्तिवाद देखील महाजन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला आहे.

 

आमची छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंतचा : विजय पाटील

 

आपण सात पानांची फिर्याद दिली असून पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर दीड पानांची एफआयआर दिसत आहे. त्यामुळे माजी मंत्री गिरीश महाजन हे तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा गुन्हा आता दाखल केला असं म्हणताय. परंतु गुन्हा तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा नव्हे, तर आमच्या छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंत अर्थात २०१९ च्या अखेरपर्यंतचा असल्याचा खुलासा एका पत्रकार परिषदेत अ‍ॅड. विजय पाटील यांनी केला होता. फौजदारी गुन्हा हा कधीही आणि कुठेही दाखल करता येतो. २०१९च्या अखेर पर्यंत गिरीश महाजन हे राज्याचे महत्वाचे मंत्री होते. यामुळे पोलीस त्यांच्याविरुद्ध फिर्याद घेणार नाहीत हे मला माहित होते. आमच्या छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंत अर्थात २०१९ च्या अखेरपर्यंतचा असल्याचेही अ‍ॅड. विजय पाटील यांचे म्हणणे आहे.

 

भोईटे गटातील ९ जणांवर ‘मकोका’

या गुन्ह्यात २९ संशयित असून त्यापैकी तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गाेकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भाेईटे व शिवाजी केशव भाेईटे या नऊ जणांवर ऑक्टोबर २०२१ मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच ‘मकोका’प्रमाणे कलम वाढवण्यात आले होते.

 

न्यायालायची बचावपक्षाला याचिका काढून घेण्याबाबत सूचना

या याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि न्या.कोतवाल यांच्या खंडपीठात याबाबत झालेल्या सुनवाईत १४ डिसेंबरला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी पुन्हा एकदा आपला म्हणणे सादर केले होते. त्यानुसार तानाजी भोईटे, शिवाजी भोईटे यांनी अटकेपासून संरक्षण मागितले. त्यावर विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी या गुन्ह्यात मोक्काचे कलम लावण्यात आले असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबतच्या आदेशाची प्रत देखील त्यांनी खंडपीठासमोर सादर केली. तसेच गुन्हा गंभीर आल्यामुळे कुणाला ही दिलासा देऊ नये, असा जोरदार युक्तिवाद केला होता.

 

विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांचा जोरदार युक्तिवाद

 

मकोका लागलेल्या गुन्ह्यात कोणताही दिलासा देता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. तसेच या गुन्ह्यातील ९ जणांवर ‘मकोका’ लावण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण याचिका काढून घ्यावी, अशी सूचना मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना केल्याची माहिती अॅड.प्रवीण चव्हाण यांनी दिली होती. दुसरीकडे फिर्यादी अॅड. विजय पाटील यांच्यावतीने अॅड. नितीन गवारे-पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. त्यांनी सांगितले की, गिरीश महाजन व इतरांना दिलासा देतांना हायकोर्टाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते. गुन्हा गंभीर असून ९ जणांना मोक्का लागलेला आहे. त्यामुळे गुन्ह्यातील कुणालाही दिलासा देऊ नये, असा युक्तिवाद अॅड. गवारे-पाटील यांनी केला होता.

 

सरकारी पक्षाने सादर केलेय शपथपत्र ; मुंबई हायकोर्टातील १२ जानेवारीच्या सुनवाईकडे लक्ष

सरकारी पक्षाने ५ जानेवारीला आपले म्हणणे न्यायालयात शपथपत्राद्वारे सादर केलेले आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून गुन्ह्यात संशयितांविरुद्ध सबळ पुरावे असल्यामुळे फिर्याद रद्द करण्याची याचिका फेटाळून लावण्यात यावी. सदर गुन्ह्यात काही आरोपींना मोक्का लावण्यात आलेला आहे. मोक्का लावतांना किमान दोन गुन्हे आवश्यक असतात. परंतू संबंधितांविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सातत्याने संघटीत गुन्हेगारी केली जातेय. या गुन्ह्यात पोलिसांनी लावलेला मोक्का कसा योग्य आहे?, हे देखील न्यायालयाच्या निदर्शनास विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आणून दिलेले आहे. दरम्यान, आता मुंबई हायकोर्टातील १२ जानेवारीच्या सुनवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

या गुन्ह्याची संपूर्ण फिर्याद वाचण्यासाठी येथे लिंक करा 

 

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

June 29, 2025
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 29, 2025
क्रीडा

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

June 28, 2025
धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
जळगाव

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

June 27, 2025
गुन्हे

जून्या वादातून तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार !

June 27, 2025
Next Post

दहा वर्षात मिळवा १६ लाख रुपये ; जाणून घ्या.. पोस्टाची 'ही' खास योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा ; म्हणाले, 3 मे पर्यंत सर्व प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा अन्यथा कारवाई !

April 18, 2022

जयसेन सरदार कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते होण्याची शक्यता !

January 4, 2022

४७ ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक व युवासैनिकांनी सज्ज राहावे : गुलाबराव पाटील

December 21, 2020

कोविड रूग्ण, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार ऑनलाईन मोफत सल्ला !

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group