मुंबई वृत्त संस्था | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करून मुख्यमंत्रिपद पटकावले असून शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केले आहे. शिंदे सरकारने बहुमताचा १४४ चा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या बंडखोरीनंतर १० दिवसांनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारने अखेरीस बहुमताची चाचणी पास केली आहे. शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. सरकारने 144 बहुमताचा आकडा पार केला आहे.
शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली. तर 3 आमदार हे तटस्थ राहिले होते. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाच मोठे नेते बहुमत चाचणीला गैरहजर असल्याचे समोर आले. विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, संग्राम जगताप यांना सभागृहामध्ये येता आले आहे. सभागृहाची दार बंद झाल्यामुळे पाच नेत्यांना येता आले नाही. त्यामुळे हे पाचही नेते मतदानाला मुकले.
त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी एकच घोषणाबाजी केली. अखेरच्या क्षणी शिवसेना आमदार शिंदे गटात दरम्यान, बहुमत चाचणीच्या आधीच शिवसेनेला धक्का बसला. संतोष बांगर हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी काल शिवसेनेच्या बाजून मतदान सुद्धा केलं होतं.