कोल्हापूर/प्रतिनिधी राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणे टाळले.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा मोठा गट घेऊन भाजपला जाऊन मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नसून तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल असेही चंद्रकांत पाटील त्यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सतत कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिल्लीला जात असल्याचे सांगितले आहे. दिल्ली दौऱ्यामागे विशेष काही कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
-शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल. राज्यात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या टीव्हीवरच दिसतात, आपला त्याच्याशी संबंध नाही. कांबोज हे सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत त्यामुळे कदाचित ते सर्वत्र दिसतात. कोण गेलेत , कोण येणार आहेत कोण, पश्चाताप कोणाला होणार? याबाबत आपण अनज्ञिज्ञ आहे. चाललेल्या घटनांशी भाजपचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.