नागपूर (वृत्तसंस्था) मुंबई ड्रग्स प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलंय. आर्यन खान प्रकरणाच्या आडून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा डाव असल्याचाही आरोप पटोले यांनी केला.
जेव्हा कोणतीही निवडणूक जवळ येते तेव्हा भाजपकडून असा प्रकारच्या घटना घडवल्या जातात. जसंच की आत्ता आर्यन खान प्रकरण घडलं. याद्वारे हिंदू आणि मुस्लिमांचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला जातो. जर मुंद्रा पोर्टवर २१ हजार कोटींचं ड्रग्ज मिळालं आहे त्याबद्दल भाजप नेते काय बोलत नाहीत? हे पोर्ट कुणाच्या मालकीचं आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज भारतात का आणण्यात आलं? याची चौकशी केली का जात नाही? असे प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत. देशात ड्रग्ज आणून तरूणाईला संपवण्याचा भाजपचा कट आहे. त्याविरोधात काँग्रेस आवाज उठवणार गप्प बसणार नाही. हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा डाव आहे असाही आरोप नाना पटोले यांनी केला.