धरणगाव (प्रतिनिधी) काँग्रेसी राज्यकर्त्यांनी वक्फ सारखे असंवैधानिक आणि काळे कायदे एका समाजाला आंदण म्हणून दिले. याचा गैरवापर करून आज देशातील जवळपास 8 लाखाहून अधिक जमीन अवैधरीत्या वक्फ बोर्डाने गिळंकृत केली आहे. वक्फचा कायदा वेळीच रहित न केल्यास पुढे यातूनच देशाचे विभाजन करण्याचा घाट घातला जाऊ शकतो. असे अनेक काळे कायदे आज हिंदूंच्या विरोधात वापरले जात आहेत. यासोबत हलाल जिहाद, वाढती धर्मांधांची लोकसंख्या, लव्ह जिहाद, धर्मांतर अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी हिंदू समाजाने संघटितपणे संवैधानिक अधिकारांचा वापर करून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करायला हवे, हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन प्रशांत जुवेकर यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० एप्रिल या दिवशी धरणगाव येथे आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेप्रसंगी बोलत होते.
यावेळी सनातन संस्थेचे घर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे यांनीही उपस्थित हिंदूंना संबोधित केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कमलेश शिर्के यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. येथील पुरोहित अथर्व बियाणी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे विनोद शिंदे यांनी मांडला. सूत्रसंचालन निखिल कदम यांनी केले.
महान भारतीय संस्कृतीनुसार आचरण करा : सद्गुरु नंदकुमार जाधव !
भारत भूमीवर असलेल्या नद्यांना गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती, तापी तसेच पर्वतांना हिमालय, सह्याद्री, सातपुडा अशी सनातन हिंदु धर्मानुसार नावे आहेत. कोणत्याही नदी किंवा पर्वताला अन्य धर्मियांचे नाव नाही. सद्या २०२३ हे इंग्रजी वर्ष चालू असून हिंदु कालगणनेनुसार ५ सहस्र १२४ वे वर्ष चालू आहे. यावरून भारतीय संस्कृती, राष्ट्र किती प्राचीन, आदर्श, सात्विक, चैतन्यमय आहे, हे लक्षात येते. विदेशात संस्कृत भाषेचे आकर्षण आहे. आपण मात्र पाश्च्यात्य संस्कृतीनुसार वाढदिवस साजरे करतो. विदेशातील लोक भारतीय संस्कृतीनुसार आचरण करू लागले आहेत. म्हणून आपण आपल्या प्राचीन, महान भारतीय संस्कृतीनुसार आचरण करायला हवे, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
‘लव्ह जिहाद’ ला हद्दपार करा : रागेश्री देशपांडे !
‘लव्ह जिहाद’ च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे; निकाह केल्यावर मारहाण करणे; प्रसंगी जीवे मारणे; वेश्याव्यवसायात ढकलणे किंवा आखाती देशांत विकणे हे आणि यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत. हे अतिशय भयावह आहे. आज देशातील ९ राज्यांत ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ संमत झाला आहे, तर काही ठिकाणी होण्याच्या मार्गावर आहे. अनेक राज्यांत झालेल्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लवकरात लवकर पारित करून लव्ह जिहादला हद्दपार करा, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे यांनी केले.