मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे पूर्णपणे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. मात्र, या गडकिल्ल्यांना भेट देताना काही समाजकंटक मद्यपान करुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारनं या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास तीन महिने शिक्षा आणि दहा हजारांचा दंड असा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. (drinking alcohol at the forts of Maharashtra)
गड-किल्ल्यांवर मद्यपानाचा प्रकार निदर्शनास आणून देणाऱ्यास त्याला ५० टक्के इनाम देता येईल का?, यासंदर्भात विधी व न्याय विभागाला मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. गड-किल्ल्यांवर हेरिटेज मार्शल नेमणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मद्यपान करणारे आता कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहेत. यापूर्वी 2020 मध्ये सरकारने असा प्रकारचा निर्णय जाहीर केला होता. गड-किल्ल्यांचे पावित्र्या राखण्यासाठी राज्य शासनाने इथं मद्यपान बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. किल्ल्यांवर मद्यमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश दिले होते.