TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षणानेच जीवनात परिवर्तन शक्य : ॲड.रोहिणीताई खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2024
in मुक्ताईनगर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातली पहिली पायरी असते. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुला-मुलींना कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात करिअरच्या अनेक वाटा आहेत,मात्र आपल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे योग्य निर्णय घेऊन सातत्यपूर्ण अभ्यासाचे नियोजन केल्यास हमखास यश मिळण्याची खात्री असते.शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होणे, संस्कारित होणे अपेक्षित असते. विद्येने व्यक्ती विनम्र होते, अंगी विनम्रता असल्यास तुमचे भविष्य उज्वल राहील.तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात असे सांगून शिक्षणाशिवाय जीवनात परिवर्तन होणे शक्य नाही,हे ओळखून चिकाटीने प्रयत्न करा, जिद्द सोडू नका, तुम्ही ठरवलेल्या क्षेत्रात घवघवीत यश संपादन करुन आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

संवेदना फाउंडेशनतर्फे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील इयत्ता दहावी- बारावीतून विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहिणी खडसे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील तर उद्घाटक म्हणून माफदाचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष विनोदभाऊ तराळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क.ब.चौउ.म.वि.चे प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, ईश्वर रहाणे, ह. भ.प. विशाल महाराज खोले, भागवत पाटील, सुधीर तराळ, निवृत्ती पाटील, रामभाऊ पाटील, पवनराजे पाटील, दत्ता पाटील, माणिकराव पाटील उचंदा, निलेश पाटील, डॉ.बी.सी.महाजन, अनिल वराडे, सोपान दुट्टे, अतुल पाटील, प्रदीप बडगुजर, विजय चौधरी, निलेश पाटील, नितीन कांडेलकर, सतिष पाटील, वामन ताठे, विशाल रोटे, संजय पाटील, हकीम बागवान, रउफ खान, शेख मुस्ताक, प्रदीप साळुंखे, निलेश भालेराव, राहुल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांच्या अनमोल मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावले. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करियरच्या विविध वाटा या विषयातील विविध पैलूवर प्रकाश टाकत उपस्थितांना तासभर खिळवून ठेवले. यावेळी कीर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी त्यांच्या कीर्तनाच्या स्टाईल मधून साध्या -सोप्या भाषा शैलीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विशद करून, अभ्यास करा, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे स्पष्ट करुन, आईबापाने तुमच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवा, सतत त्यांचे कष्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे जीवनात प्रगती साधण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा सल्ला त्यांनी मुलांना दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे आयोजित या गुणगौरव सोहळ्यामध्ये मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रांतर्गत सर्व माध्यमिक विद्यालयातील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिंनींना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकांसह संबंधित संस्थाध्यक्ष, शाळांचे मुख्याध्यापक आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीव साळवे, प्रा. डांगे सर, प्रा.प्रतिभा ढाके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संवेदना फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या : अतुल जैन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Śikṣaṇānēca jīvanāta parivartana śakya: Æḍa.Rōhiṇītā'ī khaḍasē!

Related Posts

भुसावळ

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

June 1, 2025
जळगाव

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या : अतुल जैन

May 18, 2025
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील 10 वी, 12 वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

May 16, 2025
जळगाव

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

May 13, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल !

April 30, 2025
Next Post

चिंचपूरा व पिंप्री येथे मोफत वह्या वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिचार्जवर आता ‘इतक्या’ दिवसांची वैधता ; टेलिकॉम कंपन्यांसाठी ट्रायचा नवा आदेश

April 1, 2022

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत पंकज माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वर्चस्व !

September 9, 2023

आरक्षणाशिवाय निवडणुकांविषयीच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी !

February 2, 2022

वादग्रस्त भाषण प्रकरणी वाढदिवसादिवशीच होतेय पोलिसांकडून मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

June 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group