TheClearNews.Com
Sunday, November 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नुकसान भरपाईचा १७६ कोटी रूपयांचा प्रलंबीत मदत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा !

मंत्रीमंडळाच्या बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला मुद्दा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यास १०२ कोटी ९ लक्ष रूपयांच्या मदत निधीचे तातडीने वितरण करण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा निधी प्रदान करण्याचे निर्देश दिले असल्याने आता जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकर्‍यांना तब्बल १७८ कोटी रूपयांचा मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळी वारे व पूर परिस्थितीमुळे पीकांच्या झालेल्या नुकसानीसह घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी आदींसाठीचे ७४ कोटी ८८ लक्ष रूपये तर २०१७ पासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी प्रलंबीत असणार्‍या १०२ कोटी ९ लक्ष रूपयांच्या मदत निधीचा मुद्दा आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यास या निधीचे तातडीने वितरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा निधी प्रदान करण्याचे निर्देश दिले. लवकरच सदर अनुदान प्राप्त होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

READ ALSO

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

याबाबत माहिती अशी की, २०२१ मध्ये झालेला अतिवृष्टी, वादळी वारे व पूर परिस्थितीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. यात जानेवारी ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ३ कोटी ४३ लक्ष रूपयांचे अनुदान मिळाले असून ६७ कोटी ५७ लाख रूपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबीत आहे. तर यंदाच झालेल्या अतिवृष्टीमुळे पीकांच्या झालेल्या नुकसानीसह घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी आदींसाठी ७ कोटी ३१ लाख रूपयांची मदत बाकी आहे.

यासोबत २०१७ च्या खरीप हंगामापासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या हानीचे अनुदान अद्यापही प्रलंबीत आहे. यात २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावरील बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३६ कोटी ४० लक्ष रूपयांची मदत प्रदान करण्यात आली असून अजून ११ कोटी ७० लाख रूपयांची मदत बाकी आहे. २०१८च्या खरीप हंगामातील दुष्काळाबाबत ४०२ कोटी ९७ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून ५० कोटी ७३ लक्ष रूपयांची मदत अद्याप बाकी आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९ मध्ये आलेल्या क्यार हा महा चक्री वादळामुळे झालेल्या हानीचा विचार केला असता ४७९ कोटी ९३ लक्ष रूपयांची मदत शेतकर्‍यांना मिळाली असून अद्यापही ४ कोटी ३३ लक्ष रूपयांची मदत बाकी आहे. जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीपोटी ११ कोटी ९४ लक्ष रूपयांची मदत मिळाली असून ३५ कोटी ३१ लक्ष रूपयांची मदत अजून बाकी आहे.

अशा प्रकारे यंदाचे ७४ कोटी ८८ लक्ष आणि २०१७ ते २०२० च्या दरम्यानच्या नुकसानीचे १०२ कोटी ९ लक्ष रूपये अशा एकूण १७६ कोटी ९७ लक्ष रूपयांच्या मदतीचा मुद्दा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला. शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली असल्याने हा मदत निधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करून देखील तो मिळाला नसल्याकडे ना. पाटील यांनी मंत्रीमंडळाचे लक्ष वेधून घेतले. यावर चर्चा होऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळाने आजची बिकट स्थिती लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यास हा मदतनिधी तातडीने प्रदान करण्याचे निर्देश दिले. यामुळे आता जिल्हातील आपत्तीग्रस्तांना १७६ कोटी ९७ लक्ष रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. लवकरच सदर अनुदान प्राप्त होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

November 1, 2025
चाळीसगाव

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

November 1, 2025
जळगाव

६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम

November 1, 2025
गुन्हे

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

November 1, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालक सचिव यांचे समवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चा

October 31, 2025
जळगाव

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात !

October 31, 2025
Next Post

सीए फाउंडशेन परीक्षेत चेतन चौधरीचे सुयश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बजाज फायनान्सची खोटी लिंक पाठवून पाळधीच्या व्यापाराची ऑनलाईन फसवणूक ; दोघांविरुद्ध गुन्हा !

May 7, 2022

शिंदे सरकारच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली : शरद पवार यांचा खोचक टोला !

June 16, 2023

मतदार म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी आम्ही केली मतदार नोंदणी

March 31, 2021

जिल्हा विद्या प्रसारक समाज १०३ वी वार्षिक ऑनलाइन सभा ; गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

March 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group