औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमध्ये दुकानं उघडणारच अशी घोषणाबाजी करणारे खासदार इम्तियाज जलील यांना कामगार आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून शहरातील अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत. या सील केलेल्या दुकानांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा दंड आकारला गेला आहे. हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही. दंड भरणे शक्य नसल्यामुळे या दुकानदारांना आपली दुकाने सुरु करता येत नाहीयेत. याच कारणामुळे इम्तियाज जलील कामगार कार्यालयात गेले होते.
यावेळी जलील यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यावर व्यापाऱ्यांची दुकाने कमीत कमी दंडामध्ये सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जलील यांनी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली. त्या मागणीलासुद्धा उलटसुलट उत्तर मिळाली. याच कारणामुळे जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती.
अखेर कामगार आयुक्त यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आल्याचे आरोप जलील यांच्यावर करण्यात आला आहे.