TheClearNews.Com
Monday, November 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जातनिहाय गणनेचा सांगावा…!

वाचा राष्ट्रीय राजकीय घडामोडींचे अभ्यासक श्रीविराज यांचा विशेष लेख !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 4, 2022
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (श्रीविराज) देशभरातून निवडून जाणाऱ्या लोकसभेच्या ३४५ पैकी ४० जागा म्हणजे सुमारे ११ ते १२ टक्के वाटा असणाऱ्या बिहार या राज्याने राष्ट्रीय राजकारणात कायमच मोलाची भूमिका बजावलेली आहे. दिल्ली तख्तचा मार्ग सुकर करणारे राज्य एवढी या बिहारची मर्यादित आणि संकुचित ओळख नक्कीच नाही. आताही आपल्या राज्यापुरती जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या राज्याचे महत्त्व अधोरखित केलेले आहे. त्यास किती प्रतिसाद मिळतो, यावर नितीशबाबूंच्या संयुक्त जनता दलाचे आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे भविष्यातील संबंध टिकणार आहेत.

स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारे नितीशकुमार यांचे राजकारण तसे प्रचंड बेभरोश्याचे राहिलेले आहे. आपल्या राजकीय सोयीसाठी त्यांना डोक्यावर जाळीदार टोपी राखण्यासाठी राज्यात उच्चवर्णीयांचा पक्ष मानल्या भाजपसोबत सलगी करण्यास कधीही कमीपणा वाटला नाही. दुसरीकडे भाजपला शह देण्यासाठी राज्यातील राजकीय प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यादव यांच्याही गळ्यात गळे घालण्याची खेळी केली आहे. या राजकीय संबंधांमध्ये मात्र नितीशकुमारांनी आपले महत्त्व कमी होणार नाही, याची नेहमीच पुरेपूर काळजी घेतलेली आहे. आता मात्र गेल्या काही वर्षांपासून तशी परिस्थिती न राहिल्याने नितीशकुमार यांनी भाजपला अंगावर घेण्यासह त्यांना छुपी साथ देणाऱ्या आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांना सुद्धा जमिनीवर उतरवून ठेवण्याचे सुरुवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये दोन खासदार पाठविताना मुदत संपत असलेल्या आणि केंद्रात मंत्री असलेल्या आरपीसी सिंह यांना संधी देण्याचे नितीशकुमारांना टाळले आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी मंत्री बनलेल्या आरपीसी सिंह यांना आता पुढील महिनाभरात या पदावरून पायउतार व्हावे लागू शकते. मुळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना तीन पदांसाठी नितीशकुमार आग्रही असताना आरपीसी सिंह यांनी परस्पर आपली वर्णी लावत एकाच जागेवर समझोता केल्याने नितीशकुमार त्यांच्यावर नाराजच होते. त्यावेळी ‘जेडीयू’चे अध्यक्ष या नात्याने नितीश यांनी आरपीसी सिंह यांना दिल्लीत बोलणी करण्यासाठी पाठविले होते. आरपीसी सिंह मंत्री झाल्याने त्यांच्याजागी लल्लनसिंह पक्षाध्यक्ष झाले. आता त्याच लल्लनसिंह यांच्याकडून आरपीसी सिंह यांच्या राज्यसभा उमेदवारीसाठी प्रस्ताव न आल्याचे विचार झाला नसल्याचे सांगत नितीशकुमारांनी हात वर केले आहेत. आरपीसी सिंह यांना फेरसंधी न देणे हा भाजपसाठी झुकाव असणाऱ्या ‘जेडीयू’मधील नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी सुद्धा संदेश मानला जात आहे. याशिवाय ‘जेडीयू’मध्ये लुडबूड करण्याचा प्रयत्न केल्यास सहन केले जाणार नाही, असाही सूचक इशारा नितीशकुमारांनी सरकारमधील मित्रपक्ष भाजपला दिला आहे. राज्यात २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा कमी जागा निवडून आल्याने नितीशकुमार प्रचंड अस्वस्थ झालेले आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपमधील सुशीलकुमार मोदी यांच्याशी त्यांचे अनोखे सूत जुळलेले होते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री म्हणून ते नितीशकुमारांना प्रिय होते. त्यांनी कधीही नितीशकुमारांचा शब्द पडू दिला नाही. परंतु, सुशीलकुमारांची केंद्रात गच्छंती झाल्यानंतर नितीशकुमार आणि भाजप यांच्यात संवादाचा सेतूच हरपला आहे. तो बांधण्याऐवजी भाजपने शक्य होईल तेथे ‘जेडीयू’ आणि पर्यायाने नितीशकुमार यांचे महत्त्व नाकारले. याचे ताजे उदाहरण म्हणजे बिहारमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होत असलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन आणि अन्य सोहळ्यांमध्ये नितीशकुमारांना बोलावणे तर दूरच त्यांचे निमंत्रण पत्रिकेवर नाव देखील न छापण्याचे कर्तृत्व दाखवून भाजपने त्यांना अपमानितच केले आहे. या सर्व बाबींमुळे ‘जेडीयू’मध्ये अस्वस्थ आहेच; त्यावर प्रत्युत्तर देण्याची संधी पक्ष शोधतच आहे.

READ ALSO

डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची जुनागढ येथे सेवा

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

राजकीय मानपान हा मुद्दा असला तरी त्यापेक्षा मोठा मुद्दा नितीशकुमारांसह मागासवर्गीयांच्या हक्काचा आणि मताचा निर्माण झाला आहे. देशात भाजपकडून लालकृष्ण आडवानी यांच्या नेतृत्वाखाली काढली जाणारी रथयात्रा रोखण्याचे धाडस बिहारनेच दाखविले होते. त्यावेळी राज्याची धुरा लालूप्रसाद यादव यांच्याकडे होती. यातून देशात इतर मागासवर्गाचा (ओबीसी) मतदार जागा झाला. त्याने काँग्रेसला दणका दिलाच. सोबत भाजपला शिरकावाची संधी दिली नाही. याच मतांच्या बळावर लालूप्रसाद आणि नितीशकुमार मोठे झाले. आता ही हक्काची वोटबँक केंद्र सरकारच्या धोरणामुळे संकटात सापडल्याची जाणीव या प्रादेशिक पक्षांना नव्याने झाली आहे. केंद्र सरकारने आरक्षणासंदर्भात ११ ऑगस्ट २०१८ रोजी मध्यवर्ती यादीबाबत १०२ वी घटना दुरुस्ती केली आहे. यातून राज्यांच्या अधिकारांवर थेट अतिक्रमणच करण्यात आले आहे. अर्थात, असे अतिक्रमण होत असल्याचे संसदेच्या निवड समितीने यापूर्वीच निदर्शनास आणून दिले होते. मात्र, त्याकडे ढुंकूनही न पाहता केंद्राने या विधेयकाला कायद्याचे स्वरूप देऊन टाकले. या घटनादुरुस्तीनुसार राज्यांना आपापल्या भागात मागासगवर्गीयांची यादी करता येईल. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. अर्थात, काही अपवाद म्हणून न्यायालयाने मर्यादा ओलांडण्याची मुभा दिलेली आहे. प्रत्यक्षात अशी मर्यादा ओलांडण्याचे कर्तृत्व राज्यांनी कधीच पार पाडलेले आहे. आता केंद्राच्या घटनादुरुस्तीमुळे कोंडी झाल्याने मागासवर्गीय नेमके किती, असा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय जनगणनेद्वारे ‘ओबीसीं’ची संख्या जाहीर करण्याची विनंती राज्यांनी वेळोवेळी केलेली आहे. लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारांसह बिहारमधील सर्वच पक्षांच्या नेत्यांना सोबत घेत पंतप्रधानांसह राष्ट्रपतींपर्यंत भेटीगाठी घेतल्या. मात्र, यातून तूसभरही हालचाल दिसत नसल्याने नितीशकुमारांनी आपल्या राज्याच्या पातळीवर मागासवर्गीयांची मोजणी करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या या निर्णयास पाठिंबा देण्याशिवाय प्रदेश भाजपकडेही पर्याय उरला नाही.

ऐरवी जातविरहित समाज निर्मितीचे उद्दिष्ट्य ठेवणाऱ्या भाजपकडून देशभरात हिंदू विरुद्ध मुस्लिम असे वातावरण पेटविले जात आहे. यातून निर्माण होणारी दुही सामाजिक स्तरावर किती परिणाम करू शकते, याची ओबीसींसाठी काम करणाऱ्या नेत्यांना आहे. मात्र, अगोदर मोदींच्या आणि आता यूपीवाल्या योगींच्या आक्रमकतेपुढे भाजप या ने्त्यांना किंमत द्यायला तयार नाही. ओबीसींची मोजदाद झाली तर धक्कादायक निष्कर्ष हाती येतील आणि आतापर्यंत अधिकारांसाठी फारसा आग्रही किंबहुना उदासीन असणारा हा समाज जागा होण्याची धास्ती केंद्रातील सरकारला वाटते. अर्थात, ही भीती केवळ भाजपलाच आहे, असे नाही. ती भीती यापूर्वीच्या काँग्रेस आणि अन्य सरकारांनाही होती. त्यास केवळ दोनच सरकार अपवाद ठरले. एक म्हणजे बी. पी. मंडल यांची स्थापना करणारे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि दुसरे म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांचे सरकार. आता राज्याच्या पातळीवर ओबीसींची गणना करण्याचे धाडस दाखवून नितीशकुमारांनी बिहारच्या पातळीवर परिवर्तनाची वेगळी दिशा चोखाळली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय संकट निर्माण झाल्यास तेजस्वी यादव यांचा पर्याय असल्याचेही त्यांनी दाखवून दिले आहे. नितीशकुमारांच्या या राजकीय खेळीला ‘ओबीसीं’चे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी भाजप कोणते कार्ड काढते आणि त्यास कसा प्रतिसाद मिळतो, यावर बिहारसह देशाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

..
(लेखक राष्ट्रीय राजकीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
संपर्क : 8766891437

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची जुनागढ येथे सेवा

November 2, 2025
जळगाव

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

November 1, 2025
चाळीसगाव

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

November 1, 2025
जळगाव

६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम

November 1, 2025
गुन्हे

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

November 1, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालक सचिव यांचे समवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चा

October 31, 2025
Next Post

उत्तर प्रदेशमधील हापूरमध्ये केमिकल फॅक्टरीला आग ; २० मजूर होरपळले, ८ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धाडसाचा गौरव ; जळगावच्‍या शिवांगी काळेला प्रधानमंत्री बालशक्‍ती पुरस्‍कार

January 24, 2022

स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 28, 2021

‘जामदा हाणामारी प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल’ ; अप्पर पोलीस अधीक्षकांची ग्वाही !

September 22, 2021

राज ठाकरे पुण्यात अन् मनसेचे नेते वसंत मोरे इफ्तार पार्टीत ; फोटो केला शेअर

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group