साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयाला दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या संविधान दिनचा चक्क विसर पडलेला असून या दिन दिलेल्या कुठल्याही नियमाने साजरा न करता या दिनाचा अवमान केलेला आहे. यादरम्यान आज दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी साकळी ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग सुद्धा होती. मात्र या मीटिंग दरम्यान सुद्धा संविधान दिन साजरा करण्याचे कुठलेही औचित्य व शहाणपण संबंधित ग्रा.पं. प्रशासनाने दाखवले नव्हते. मीटिंग संपल्यानंतर अनेक पदाधिकारी यांनी घरचा रस्ता धरला होता. तक्रारदाराच्या तक्रारी काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ‘नावापुरताच’ व ‘ दिखाऊ’ पद्धतीने संविधान दिन साजरा केला. तरी या प्रकाराची आपल्याकडून सखोल चौकशी होऊन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा माझ्या अर्जावर कुठलाही न्याय न मिळाल्यास मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उपोषणाला बसणार आहे. अश्या आशयाची तक्रार भारिप बहुजन महासंघाचे ता.उपाध्यक्ष मिलींद जंजाळे यांनी वरीष्ठांना दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनाद्वारे दिलेला आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी सदर प्रकाराचा निषेध केलेला आहे.
या बाबत सविस्तर असे की, मिलींद जंजाळे यांनी दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा दि.२६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि.२४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. संपूर्ण भारत देशातील जनतेला न्याय,हक्क व कर्तव्याच्या जाणीवेतून मानवतेच्या भावनेने जगण्यासाठी प्रेरीत करणारा असा हा पवित्र ग्रंथ आहे. एवढे महत्व सांगणाऱ्या या संविधानाच्या गौरवार्थ शासनाने घोषित केलेल्या दिवशी म्हणजे दिनांक दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी संविधान दिन साजरा करण्याचे शासनाने सुचित केलेले असतांना सुद्धा, साकळी ता. यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाला संविधान दिन साजरा करण्याचा चक्क विसर पडलेला आहे.हा दिन दिलेल्या कुठल्याही नियमाने साजरा न करता या दिनाचा अवमान केलेला आहे. यादरम्यान आज दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी साकळी ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग सुद्धा होती. तेव्हा या मीटिंग दरम्यान सुद्धा संविधान दिन साजरा करण्याचे कुठलेही औचित्य व शहाणपण संबंधित ग्रा.पं. प्रशासनाने दाखवले नव्हते .जेव्हा माझ्या लक्षात ही बाब आली तेव्हा मी स्वतः मासिक मीटिंग ठिकाणी जाऊन सरपंच, उपसरपंच,ग्राम विकास अधिकारी व उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना एक सुज्ञ नागरिक म्हणून चांगलेच खडसावून विचारले की, आज सविधान दिन का साजरा केला नाही ? त्यावर मात्र सरपंचासह उपस्थितांपैकी कोणीही बोलले नाही. तेव्हा माझा संताप अनावर झाला व मी माझा संताप शिवसाळ भाषेतच व्यक्त केला. त्यांना काय लाज वाटली जेव्हा मीटिंग संपली त्यानंतर अनेक पदाधिकारी यांनी घरचा रस्ता धरला.मात्र काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ‘नावापुरताच’ व ‘दिखाऊ ‘ पद्धतीने संविधान दिन साजरा केला.कारण आजच्या रोजी प्रतिमा पूजन करून संविधान दिन वाचन व्हायला पाहिजे होते. मात्र तसे काही केलेले नाही तेव्हा एकूणच आज साकळी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने संविधान दिन योग्य प्रकारे साजरा न करता या दिनाचा चक्क अवमानच केलेला आहे तरी या प्रकाराची आपल्याकडून सखोल चौकशी होऊन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांवर कठोरात -कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.अन्यथा माझ्या अर्जावर कुठलाही न्याय न मिळाल्यास मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करुन उपोषणाला बसेल. असा इशारा जंजाळे यांनी तक्रारी निवेदनाद्वारे दिलेला आहे.सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी (जळगाव),प्रांतधिकारी(फैजपूर),जिल्हा पोलिस अधिक्षक (जळगाव),तहसिलदार (यावल),पोलिस निरिक्षक (यावल)साकळी ग्रा.पं.प्रशासन यांना देण्यात आलेल्या आहे.
भारतीय संविधान दिन पूजनीय- ग्रामपंचायत प्रशासनाला संविधान दिन साजरा करण्याचा विसर पडलेला नसून दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा केलेला आहे .भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या महत्वाच्या व पूजनिय दिवसाचे स्मरण केलेले आहे. भारतीय संविधान हे आपल्या ग्रामपंचायत प्रशासनासाठी पूजनीय आहे. अशी प्रतिक्रिया प्रभारी ग्रामविकास अधिकारी मकरंद सैंदाणे यांनी दिली