मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीची कारवाई आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या एका माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली आहे” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. तसेच त्याचा भांडाफोड करणार असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.
“नवाब मलिक घाबरला आहे, असे ज्यांना वाटतं, ते चुकीच आहे. नवाब मलिक घाबरणार नाही. शेवटपर्यंत लढाई घेऊन जाणार. चोरोने हैं ललकारा मिलेगा करारा जवाब अस मलिक यांनी म्हटलं आहे. “काल दुपारपासून माध्यमातून अफवा पसरवण्याचे काम काही सरकारी यंत्रणा करत आहेत. नवाब मलिक ईडीच्या रडारवर आहे, असं सांगितलं जात आहे. ईडीने अफवा पसरवू नये. पत्रकार परिषद घेऊन ईडीने खरं काय ते सांगावे” असे मलिक म्हणाले.
“तुम्ही कोणाची प्रतिमा खराब करु शकत नाही. वरिष्ठांना खूष करण्यासाठी खेळ खेळला जातोय. ईडी सहकार्य करत असेल, तर आम्ही स्वागत करतो. सात प्रकरणात आम्ही एफआयआर दाखल केलाय. वक्फ बोर्डात क्लीनअप सुरु आहे. वक्फ बोर्डातील मलिकांचा घोटाळा बाहेर काढू, असं भाजपवाले सांगत आहेत” असे मलिक म्हणाले.