धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त माळी समाज पंच मंडळच्या वतीने सालाबादा प्रमाणे ह्या वर्षी देखील हरीनाम किर्तन सप्ताह नुकताच उत्साहात संपन्न झाला. पालखी मिरवणुकीत लेझिम पथकासह वारकरी संप्रदायचे टाळकरी मंडळ सहभागी झाले होते.
सदर मिरवणुक समाज मंदीरा पासुन लहान माळी वाडा, कोट बाजार, खत्री गल्ली, पातालनगरी वरून समाज मंदीरा जवळ समारोप करण्यात आला. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत काल्याचे किर्तन झाले. १ ते ८ सप्टेंबरच्या दरम्यान असलेल्या या किर्तन सप्ताहाचा कार्यक्रमात जिल्हा परिसरातील नामांकीत किर्तनकारानी आपली हजेरी लावली होती. तर गुरुवार रात्री ह.भ.प.जिवराम महाराज कापडणेकर यांच्या काल्याचा किर्तनाने समारोप करण्यात आला. सामाजिक एकता समता व समरसता हाच संत व महात्मे महाकाल असल्याचे प्रतिपादन करून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत सांवता महाराज, संत नामदेव व संत मुक्ताबाई सहीत अनेक संत व महात्म्याचे विचार या जगाला प्रेरणादायी असल्याचे नमुद करून सातशे वर्ष पुर्वी संतांनी लिहलेला संत वाड्मयाची आजही हुबेहुब पुनरावृत्ती होत असल्याचे नमुद करून भाविकांनी भगवंताचे नामस्मरण करून आपले जिवन सार्थकी करावे असे आवाहन केले.
समाजाचे माजी अध्यक्ष स्व. किसन गबा महाजन यांचा स्मृतीप्रितर्थ भटु महाजन व राजेद्र महाजन यांच्या वतीने व समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांचा माध्यमातून हा अंखड किर्तन सप्ताहचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख,विलास महाजन,राजेद्र महाजन,पुंडलिक महाजन,सुधाकर महाजन,जेष्ठ पत्रकार कडू महाजन,सुभाष पाटील,दिपक महाजन,गुलाब महाजन,नाना महाराज,हर्षल महाजन,दयाराम महाजन,कालिदास महाजन,शांताराम महाजन यांच्यासह पंच मंडळ व समाज बांधव सहभागी झाले होते.