TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘स्वच्छ अमृत महोत्सवां’तर्गत जळगावला ‘३ स्टार रेटिंग’

दिल्लीत जळगावकरांच्या वतीने महापौर महाजन यांनी स्वीकारला पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2021
in जळगाव, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे (एमओएचयूए) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज आयोजिलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव-२०२१’ अंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहरांना सर्वांत स्वच्छ असल्याबाबतचा वर्ष २०२१ करिता पुरस्कार प्रदान केला. यामध्ये कचरामुक्त शहरासाठीचा जळगावला थ्री स्टार रेटिंग हा पुरस्कार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते जळगावच्या महापौर जयश्री सुनिल महाजन व महापालिका उपायुक्त पवन पाटील यांनी स्वीकारला.

यावेळी छत्तीसगडचे नागरी प्रशासन आणि विकास राज्यमंत्री डॉ.शिवकुमार डहरीया व स्वच्छ भारत अभियानाच्या संचालिका व सहसचिव श्रीमती रूपा मिश्रा यावेळी उपस्थित होत्या. समस्त जळगावकरांच्यावतीने आज महापौर व उपायुक्त यांनी तो स्वीकारला. या पुरस्काराच्या निवडीत देशात सर्वाधिक महाराष्ट्रातील ६९ शहरांचा समावेश आहे.

READ ALSO

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

भारताला स्वच्छ बनविण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्ये आणि शहरांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी एकूण ४३२० शहरांचे पॅरामीटर मूल्यांकन करण्यात आले आहे. यापैकी २२३८ शहरे त्यात पात्र ठरली. या अहवालानुसार भारतातील स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत अनेक बदल झाले. तरीही इंदूरने सलग पाचव्यांदा भारतातील सर्वांत स्वच्छ म्हणून निवडले गेले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुरत (गुजरात) आणि विजयवाडा (आंध्रप्रदेश) यांना अनुक्रमे देशातील दुसर्‍या आणि तिसर्‍या स्वच्छ शहरांचा गौरव केला. वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये वाराणसीला सर्वांत स्वच्छ गंगा शहर श्रेणीत प्रथम स्थान दिले. तसेच छत्तीसगडला देशातील सर्वांत स्वच्छ राज्य म्हणून गौरविले. रायपूरने गतवर्षीच्या क्रमवारीत २१ व्या स्थानावरून यंदा सहावे स्थान पटकावले आहे.

‘प्रेरक दौर सन्मान’ पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये एकूण पाच अतिरिक्त उपश्रेणी आहेत. ज्यात दिव्य (प्लॅटिनम), अनुपम (गोल्ड), उज्ज्वल (रौप्य), उदित (कांस्य) आणि आरोही (आकांक्षी) आहेत. यात ओला, सुका आणि धोक्याच्या श्रेणींमध्ये कचर्‍याचे वर्गीकरण, शहरांच्या स्वच्छतेची स्थिती, लँडफिलमध्ये जाणार्‍या कचर्‍याची टक्केवारी आणि इतर घटकांच्या आधारे शहरांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आज स्वच्छ अमृत महोत्सव २०२१ मध्ये १२९ स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, १२ सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार आणि कचरामुक्त शहरांसाठी १५२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी 2238 शहरांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंग प्रोटोकॉलच्या मूल्यांकनात भाग घेतला. त्यात नऊ- 5 स्टार, 143- 3 स्टार आणि 147-1 स्टार रेट केलेल्या शहरांसह, शहरी भारत माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या कचरामुक्त शहरांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या मार्गावर आहेत.

थ्री स्टार दर्जाचा पुरस्कार जळगावकरांसाठी भूषणावहच! : महापौर सौ. महाजन

याप्रसंगी महापौर जयश्री सुनिल महाजन म्हणाल्यात, “खरंतर शहरातील नागरिक विविध अडचणींचा सामना करताना मेटाकुटीस येतात. मात्र, सामंजस्य अन् सजगतेचा प्रत्यय आणून देत कचरा विलगीकरणाच्या प्रक्रियेत ते अग्रस्थानी राहिले. त्यासाठी ‘महापौर सेवा कक्षा’च्या माध्यमातून वारंवार केले जाणारे आवाहन व समन्वयही तितकेच महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळेच महाराष्ट्रातील ६९ शहरांमध्ये जळगावचा समावेश होऊन केंद्र सरकारचा कचरामुक्त शहरासाठीचा थ्री स्टार दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला, ही जळगावकरांसाठी भूषणावह बाब आहे. याबद्दल समस्त जळगावकर, महापालिकेच्या आरोग्य विभागासह या अभियानात सहभागी सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांचे मी मनापासून कौतुक करते व आभारही मानते. हे सर्व शक्य झालं ते जळगावकरांमुळेच. भविष्यातही उत्तमोत्तम कामगिरी करून आपण यापुढील दर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न करू.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
Next Post

आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत ; मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या किरण पाटील BWAI ब्युटी अवॉर्ड असोसिएशन ऑफ इंडिया २०२२ पुरस्काराने सन्मानित !

August 30, 2022

कोरोना विस्फोट : जिल्ह्यात आज आढळले ४०९ कोरोनाबाधित !

January 18, 2022

खासदार निधीतून बाकडे खरेदीत २५ लाखांचा अपहार ; नगरसेवक प्रशांत नाईक यांचा आरोप !

August 24, 2023

वरणगावात 261 नर्मदेश्वर शिवलिंगाचे वाटप ; 51 कुमारिका पूजन आणि भंडारा !

August 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group