धरणगाव (प्रतिनिधी) हवामान विभागाने जरी यंदा गत वर्षांच्या तुलनेत सरासरी कमी पाऊस पडणार असल्याचे जाहीर केले असले, तरी मात्र यंदाही गत वर्षांच्या तुलनेने पाऊस पडणार आहे. अलनिलो वादळाचा पावसावर काहिही परिणाम होणार नसल्याचे भाकीत हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील यांनी व्यक्त केले.
धरणगाव येथे बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या प्रांगणावर स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यानमालाचे चौथे पुष्प गुंफताना परभणी येथील हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डक पाटील बोलत होते. प्रारंभी व्याख्याते पंजाबराव डक पाटील यांचा संस्थेचे संचालक रघुनाथ चौधरी यांनी सत्कार केला. व्याख्यानमालेचे दाते राजेंद्र अंकुश पाटील, मेहुल हेमराज भाटिया यांचा पंजाबराव डक भाटिया यांचा पंजाबराव डक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक ए. डी. पाटील यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन महेश आहेरराव यांनी तर आर. एम. चौधरी यांनी आभार मानले.
या वेळी शहरासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. या वेळी पंजाबराव डक पाटील म्हणाले की, मी आतापर्यंत १४ हजार गावांना भेटी दिल्या आहे. दररोज १८ तास प्रवास करतो. तसेच जेवढे शक्य असेल तेवढे शेतकऱ्यांना हवामान व पावसाविषयी मार्गदर्शन करतो. सन २००९ सालापासून मी हवामानाचा अंदाज सांगत आहे. आज सुमारे १ हजार २५० व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दररोज सोशल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ८ जूनला होणार मान्सूनचे आगमन…..
यंदा ८ जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. तर २२ जूनपासून आहे. गेल्या चार वर्षापासून जळगाव जिल्ह्यात १०० टक्के पाऊस पडण्याचे मुख्य कारण म्हणजे या चारही वर्षापासून पूर्वेकडून पाऊस येत आहे. यंदाही पूर्वेकडूनच पाऊस महाराष्ट्रात २२ फेब्रुवारी ते १० मार्च यादरम्यान गारपीट होते. गारपीट महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडणार येणार असल्याने पावसाचे प्रमाण १०० टक्के राहिल. दरवर्षी डोंगर भागात वा खडकाळ जमिनीवर होते. जेथे काळी जमीन आहे, तेथे गारपीट होत नाही. सध्याची स्थिती पाहता २५ ते २५ एप्रिल दरम्यान कोकणात गारपीट होईल, असे त्यांनी सांगितले.
तापमान कमी करण्यासाठी झाडे लावा !
सन २०१५ मध्ये जल पातळी खोल गेली होती. त्यावेळी जमिनीत १०० फुटावर पाणी होते, त्यानंतर २०१६ पासून तर आजपर्यंत जल पातळी वाढल्याने आज जमिनीत २० फुटावर पाणी आहे. पावसाने आपली दिशा बदलल्याने पावसाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. सन २०१५ मध्ये तापमान ४३ अंशावर होते, त्यानंतर ४३पासून तर ४७ अंशांपर्यंत तापमान वाढले. तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे. याचा अर्थ असा नाही की तापमान वाढले म्हणजे पाऊस वाढतो. परंतु आपल्याला तापमान कमी करायचे असेल तर झाडे लावली पाहिजेत. असेही पंजाबराव डक पाटील म्हणाले.