जळगाव (प्रतिनिधी) काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अन्नत्याग साखळी आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाने जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात जाग आली. तात्काळ शिक्षण विभागाने दखल घेऊन परिपत्रक काढत सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनच्या उपोषणकर्त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी अकलाडे तसेच शिवसेनेचे विष्णू भंगाळे, शरद तायडे, सरिता माळी यांनी शरबत देऊन उपोषणाची सांगता केली.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या १० दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनतर्फे शिक्षण अधिकारी व शिक्षण सभापती जिल्हा परिषद, जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार निवेदनातून कळवला होता व त्यापासून विद्यार्थ्यांना व पालकांना यातून दिलासा मिळाला अशी मागणी केली होती.
परंतु कुठलीच कारवाई झाली नाही. जिल्हा प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे २३ जुलै रोजी अन्नत्याग साखळी उपोषण छेडण्यात आले होते. कोविड-१९ च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. अशातच काही खासगीशाळा ह्या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फीस आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे. त्यात काही शाळा ह्या कोविड सुरू होण्याआधी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत. पालकांनी का म्हणून इतर फीस द्यायची, तसेच फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना काढले जात आहे.
अशा या परिस्थितीत सर्व सामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भरत आहे. तरी खासगी शाळांची ही अवाजवी फीस कमी करून फक्त ट्युशन फीस घ्यावी आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी. अन्यथा महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन येत्या दोन दिवसात अन्यत्याग आंदोलनाची (आमरण उपोषण) करेल, असा इशारा महाराष्ट्र स्टुडंन्ट्सकडून देण्यात आला होता. त्यानुसार २३ जुलै २०२१ पासून आंदोलनाकरिता बसले होते.
ह्या आंदोलनाने जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात जाग आली व तात्काळ शिक्षण विभागाने दखल घेऊन परिपत्रक काढले. महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनच्या मागण्या ह्या मान्य होऊन माध्यमांतून विद्यार्थी व त्यांचा पालकांना न्याय मिळाला आहे. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनच्या उपोषण कर्त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी अकलाडे तसेच शिवसेनेचे विष्णू भंगाळे, शरद तायडे, सरिता माळी यांनी शरबत देऊन उपोषणाची सांगता केली. ह्या उपोषणात विभागप्रमुख अभिजित रंधे यांचा नेतृत्वाखाली हे उपोषण पार पाडले. दीपक सपकाळे, निलेश जाधव सामाजिक कार्यकर्ते, चेतन चौधरी, रोहन महाजन, सचिन बिऱ्हाडे संतोष भंगाळे, ललित पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.