कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू पुन्हा चालली आहे. दिनहाटा, गोसाबा, खर्डा आणि शांतीपूर विधानसभा जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. टीएमसीच्या उमेदवारांनी सर्व जागा जिंकल्या आहेत.
दिनहाटा, गोसाबा, खर्डा आणि शांतीपूर विधानसभा जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. टीएमसीच्या उमेदवारांनी सर्व जागा जिंकल्या आहेत. दिनहाटामधून उदयन गुहा, खर्डामधून शोभनदेव चट्टोपाध्याय, गोसाबातून सुब्रत मंडल आणि शांतीपूरमधून टीएमसीचे उमेदवार ब्रजकिशोर गोस्वामी विजयी झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत टीएमसीने भाजपचा दारूण पराभव केला होता. भवानीपूरसह तीन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयाचा धडाका कायम राहिला आणि आता पुन्हा सर्व टीएमसीचे उमेदवार चार विधानसभा जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. या विजयासह विधानसभेत टीएमसीच्या आमदारांची संख्या २१७ झाली आहे. तर, भाजपमधून आलेल्या आणखी पाच आमदारांचा समावेश केल्यास ही संख्या २२२ वर पोहोचली आहे.
हे उमेदवार विजयी झाले
गोसाबा येथे तृणमूलचे उमेदवार सुब्रता मंडल १ लाख ५१ हजार मतांनी विजयी झाले आहेत. दिनहाटाचे टीएमसीचे उमेदवार उदयन गुहा १ लाख ६३ मतांनी विजयी झाले आहेत. खर्डामधून टीएमसीचे उमेदवार शोभनदेव चट्टोपाध्याय विजयी झाले आहेत. तर, शांतीपूरमधून टीएमसीचे उमेदवार ब्रजकिशोर गोस्वामी ६३ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.