TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ताण तणाव व्यवस्थापनावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2022
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मानसशास्त्र विभाग तसेच मानसमित्र समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ताण तणाव व्यवस्थापन’ या विषयावर आधारित ‘एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे’ आयोजन दि.२८ मार्च रोजी करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उदघाटन डॉ.जी. बी. चौधरी (अध्यक्ष, मानसशास्त्र अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या हस्ते कै.मा. ना.अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) व संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार कै. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.जी. बी. चौधरी (अध्यक्ष, मानसशास्त्र अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा), बीजभाषक प्रा.डॉ.सी.पी.लभाने (मानसशास्त्र विभाग प्रमुख, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. यु. अहिरे (सहा. प्रा.मानसशास्त्र विभाग, जी. टी. पी. महाविद्यालय, नंदुरबार) व डॉ. एस. वाय. जाधव (मानसशास्त्र विभाग प्रमुख, एस. एस. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे) त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, कार्यशाळेचे समन्वयक तसेच मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर. आर. पाटील, एस. जी. देवरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वृक्ष संवर्धनाच्या उद्देशाने उपस्थित मान्यवरांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

READ ALSO

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

या कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना कार्यशाळेचे समन्वयक व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात व आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना ताणतणावाला सामोरे जावे लागते. बाहेरील नैसर्गिक, मानवनिर्मित घटकांचा माणसांच्या मनावर तसेच कर्मचाऱ्यांच्या मनावर, जीवनावर परिणाम होतो, त्याचे व्यवस्थापन व्हावे तसेच नोकरीत निर्माण होणाऱ्या ताणतणावाचे व्यवस्थापन करून भविष्यातील अडचणी टाळता याव्यात या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत देशभरातील २०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात अनेकांच्या मनावर ताण निर्माण झाला. तंत्रज्ञानाचा वापर या काळात वाढला. त्याचे फायदे व तोटे देखील जाणवले. या सर्वांतून तणावमुक्त होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे’.

उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना डॉ.जी. बी. चौधरी म्हणाले की, ‘ताणतणाव जेव्हा अतिउच्च पातळीवर जातो तेव्हा त्याचे व्यवस्थापन कसे करावे? हे जाणून घेतले नाही तर जीवनात अनेक संकटे निर्माण होतात. ताणामुळे माणसे एकमेकांपासून दुरावतात. सुसंवादाने प्रश्न सोडविले तर ताण दूर करण्यास मदत होते. कौतुक करणे व संवाद साधणे ही तणावमुक्त होण्याची साधने आहेत’.

याप्रसंगी प्रा. डॉ. सी. पी. लभाने कार्यशाळेचे बीजभाषण करतांना म्हणाले की, ‘कार्यात अडथळा आल्यावर मेंदूची विचार प्रक्रिया विस्कळीत होते व त्यातून ताण निर्माण होतो. नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त शारीरिक व मानसिक कार्य केल्याने ताण निर्माण होतो. सभोवतालचे वातावरण, व्यक्तिगत कारणे, खोटे बोलणे, चुकीची कृती करणे यातून तणाव निर्माण होतो. म्हणून परिस्थिती पाहून वर्तन केल्यास तणावमुक्त होता येते. शारीरिक व्याधी, अयोग्य आहार, चिंता, सतत काम करण्याची वृत्ती, घटस्फोट, तुरुंगवास, दुखणे, चिडचिड, प्रचंड राग, उदास, अर्थहीनता, आत्मविश्वास कमी होणे ही ताणतणावाची लक्षणे आहेत. हा ताण करण्यासाठी विपरित वागू नका, आत्मविश्वास जागृत ठेवा, आत्मटिका करू नका, अपयश सहजतेने घ्या, कामाचा अतिरेक टाळा, प्रोत्साहन देण्याऱ्या समूहात राहा, विनोदी राहा व नियमित व्यायाम करा’.

यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘व्यक्तिपरत्वे ताणतणाव वाढत असतो. अतिताणामुळे आत्महत्या, मृत्यू यांचे प्रमाण वाढले आहे ही चिंताजनक बाब आहे. कामात प्रामाणिकपणा ठेवणे, सकारात्मक विचार करणे यातून तणाव कमी करता येईल. तणावमुक्त जीवन जगल्यास जीवन सुधारता येईल’. या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन सौ.एस.बी.पाटील यांनी केले तर आभार एस.बी. देवरे यांनी मानले.

या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राप्रसंगी डॉ.एस.यु.अहिरे ‘ताण तणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘विचार करण्याच्या प्रक्रियेतून ताण निर्माण होतो.उत्तम आरोग्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व चांगली मानसिकता असावी लागते. संगीत, कला, गायन, लेखन व व्यायाम यातून तणाव दूर करता येऊ शकतो.ताणतणाव दूर करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या, चांगला विचार मनात आणा. नेहमी हसत राहा. त्यातून तणावमुक्त जीवन जगता येईल.शरीरावर व मनावर अपेक्षांचे ओझे असेल तर ताण निर्माण होतो. मानसिकता बिघडण्यातून आरोग्यावर परिणाम होतो. चांगला ताण सकारात्मकता, उत्साह, ध्येयपूर्तीसाठी ऊर्जा देत असतो. अयोग्य ताणामुळे शरीराची व मनाची कार्यक्षमता कमी होते. त्याची कारणे शोधून उपाययोजना केल्यास जीवन सुरळीत जगता येते.

या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.सचिन वाय. जाधव मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, डॉ. एस. वाय. जाधव, डॉ. व्ही. पी. पाटील, डॉ. आर.आर.पाटील व रजिस्ट्रार डी. एम. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. सचिन वाय. जाधव ‘How to Deal with Stress in Daily Life? या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘ताणतणाव निर्माण होण्यासाठी आनुवंशिकता, जैवरसायने, मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये दोष, भावनिक बुद्धीचा अभाव, कौटुंबिक वातावरण, सततचा ताण, चिंता अशी करणे असू शकतात. या ताणामुळे वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, आत्मविश्वास कमी होतो व सतत चिंताग्रस्त राहणे असे परिणाम होतात. म्हणून ताणतणाव व्यवस्थापनासाठी स्वतःला ओळखा, सकारात्मक राहा, स्वतःतील क्षमता ओळखा, नवीन छंद जोपासा, मनातील विचार मुक्तपणे व्यक्त करा, यामुळे ताण कमी करण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी फुग्याच्या प्रत्यक्षिकासह तुलना व स्पर्धेतून ताण कसा निर्माण होतो हे दाखवून दिले.

यावेळी डॉ. व्ही. पी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, ‘कोणतीही व्याधी निर्माण करण्यात मन कारणीभूत असते. म्हणून सकारात्मक विचारामुळे व्याधी व ताणापासून दूर राहता येते. या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. व्ही. पी.,पाटील, डॉ. एस. वाय. जाधव, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आर.आर.पाटील तसेच रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रा. श्वेता जैन यांनी आपले प्रातिनिधिक मत व्यक्त केले.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य एन. एस. कोल्हे म्हणाले की, ‘दैनंदिन कामातून वेळ काढून ताणतणावावर मात करावी. ताणाचा व जीवनातील सुखाचा जवळचा संबंध आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास ताण कमी होतो. या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. बी. पाटील यांनी केले तर आभार एस. बी. देवरे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत विभागातील विद्यार्थी, सर्व समिती सदस्य तसेच मानसमित्र मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले तसेच ईशीता कन्स्ट्रक्शन, चोपडा, रेयॉन प्रोटेक्शन प्रा. लि. जळगाव तसेच सारस केमिकल्स एजन्सी, अमळनेर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून बहुसंख्य शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025
चोपडा

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

May 28, 2025
गुन्हे

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक ; 3 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2025
चोपडा

शेतातील कडब्याला अचानक लागलेल्या आगीत होरपळून अनवर्दे खुर्द येथील शेतकऱ्यांचा दूर्दैवी मृत्यू

May 18, 2025
गुन्हे

सराफा दुकान फोडले; ६० हजारांचा माल लंपास

May 16, 2025
गुन्हे

ऑनरकिलींग : बापाने केला मुलीसह जावईवर गोळीबार ; मुलीचा मृत्यू!

April 28, 2025
Next Post

दिल्लीत पेट्रोलची शंभरी ; आज पुन्हा उडाला पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सत्तारांपाठोपाठ शिंदे गटाचे ‘हे’ आमदार अडचणीत ; मुलीचं नाव टीईटी घोटाळ्यात आलं समोर !

August 25, 2022

विद्यार्थ्यांचा निकाल रोखल्याप्रकरणी शानबाग विद्यालय दोषी ; गटशिक्षण अधिकाऱ्यांचा चौकशीअंती अहवाल !

May 21, 2021

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य – डॉ. अनिल काकोडकर

November 10, 2024

संतापजनक : साकरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ; एका विरुद्ध गुन्हा

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group