मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. तर विरोधकांकडून प्रत्यारोप सुरू झाले आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीवर प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्वीट केलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी सत्तानाट्यावर भाष्य करत महत्वाच्या बाबींवर मत व्यक्त केलंय.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, या प्रक्रियेत विधानसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका घेणे महत्वाची आहे. उपाध्यक्षांना जास्त अधिकार आहेत की नाही ते पाहावं लागेल. एकनाथ शिंदेनी जरी राज्यपालांकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले तरी राज्यपालांना बिनाफ्लोअर टेस्ट सरकार बरखास्त करता येणार नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा तर आहे. तरी याआधी इतर राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी न्यायालयानेही फ्लोअर टेस्टचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले.
आंबेडकर यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदेंकडून सादर केल्या जाणाऱ्या पत्रावर ज्याच्या सह्या आहेत त्या प्रत्येक आमदाराला प्रत्यक्ष बोलावून त्यांनी कोणत्या मानसिक अवस्थेत सही केलीय हे उपाध्यक्ष विचारु घेता येईल. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार सध्या दिसत आहे. जर भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास त्यांच्या गट भाजपमध्ये विलिन करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांचं शिवसेना म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. एकनाथ शिंदे याला तयार होतील का? असंही आंबेडकर यांनी सवाल केला आहे