मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्यात बदल होणार या चर्चा सगळीकडे सुरु होत्या. आता राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. या दौऱ्याची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतून जवळपास १५ हजार मनसे कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत.
मुंबईतील मनसेच्या (MNS) प्रत्येक विभाग अध्यक्षाने एक बोगी बुक केली आहे. शाखा निहाय अयोध्येला येणाऱ्या लोकांची नोंदणी सुरू आहे. मुंबईत मनसेचे एकूण ३६ विभाग अध्यक्ष आहेत. मुंबईतून मनसेच्या अयोध्येला चार रेल्वे जाणार आहेत. ठाणे, रायगड, पुणे, नाशिक येथुन मनसेच्या सहा रेल्वे अयोध्येला जाणार आहेत. औरंगाबाद, नागपूर आणि जिल्ह्यातून रेल्वे बुकिंग सुरू आहे. आतापर्यंत एकूण बारा रेल्वेचे मनसेचे बुकिंग झाले आहे. रस्ते मार्गेही मुंबईतून अनेक मनसे पदाधिकारी अयोध्येला जाणार आहेत. ५ जून पूर्वीच हे पदाधिकारी अयोध्येत दाखल होणार आहेत. मुंबईतून बोरिवली विभागातून १०० गाड्या अयोध्येला जाणार आहेत. तर मुंबईतल्या वेगवेगळ्या विभागातून अश्याच पद्धतीने गाड्या जाणार आहेत.
मुंबईतून जवळपास १५ हजार मनसे कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. यामध्ये मनसेच्या दाव्यानुसार मुंबईतील अनेक उत्तर भारतीयही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला येणार आहेत. मनसेकडून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे.