कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा येथील राजाभाऊ मंत्री ग्रा.बि. शेती पतसंस्थेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा जळगाव कासोदातर्फे प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, राजाभाऊ मंत्री ग्रा.बि. शेती पतसंस्थेची स्थापना सण १९९१ मध्ये झाली असून यासंस्थेने आज पावेतो सामाजिक बांधीलकी जोपासत संस्थेतर्फे परिसरातील २० वर्षांपासून सलग १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान करत आले. त्यांनी आपल्या संस्थेचे सभासद व त्यांच्या मुलास कन्यारत्न (मुलगी) झाल्यास त्या मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्स डिपॉसिट देत असत तर सभासदांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास संस्थेतर्फे ५ हजार रुपयांची रोख मदत संस्थेने सभासदांना उपलब्ध करून दिली आहे. संस्थाही गावाचे हित जोपासत ग्रामस्थांसाठी मृत व्यक्तीस घेऊन जाणेसाठी ग्रा.पं.तिला २ तिरडी व १ इलेक्ट्रीकल शव पेटी भेट दिली तसेच गावांतील ग्रीन आर्मी सदस्यांकडून लावण्यात आलेल्या वृक्षांना यासंस्थेने १ लाख रुपये किमतीचे ट्रीगार्ड भेट दिले असेच सामाजिक कार्यरत असलेल्या संस्थेने कोरोना साथरोग महामारी आजाराच्यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून २ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला. तर कोरोना आजाराने मृत झालेल्या सदस्याला १० हजार रुपये रोख अशी मदत केली. तसेच गावातील ग्रामस्थांसाठी दरवर्षी सामाजिकता बाळगत समाजकार्य ह्या संस्थेतर्फे वर्षानुवर्षे सुरूच ठेवले आहे. या संस्थेचे संस्थापक संचालक हे ११ इतकी संख्या असून यांच्यामध्ये कुठलेही मतभेद नसून संस्थेमार्फत कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी व जनतेची सेवा केल्याचे लक्षात घेता मराठी पत्रकार संघाने आज संस्थेचे (संचालक) चेअरमन पांडुरंग आप्पा वाणी यांचा प्रशस्तीपत्र ट्रॉफी व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी व्हा.चेअरमन जगन्नाथ सोनवणे, व्यवस्थापक संजीव नवाल, सल्लाउद्दीन शेठ, दामू वामन भोई, सरपंच महेशबापू पांडे, मनोहर वाणी, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष सागर शेलार, ग्रा.तालुका अध्यक्ष वासुदेव वारे, पत्रकार शैलेश मंत्री, पत्रकार राहुल मराठे व आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच महेश पांडे हे होते. कर्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वासुदेव वारे यांनी मांडले तर आभार संस्थेचे चेअरमन पांडुरंगआप्पा वाणी, व्यवस्थापक संजीव नवाल यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.