जामनेर (प्रतिनिधी) कोरोना महामारीत रासायनिक खतांच्या झालेल्या दरवाढ त्वरित कमी करण्यात यावी, अशी मागणी जामनेर राष्ट्रवादीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर निलेश रमेश पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जामनेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष निलेश रमेश पाटील यांनी जामनेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सद्या कोविड-१९ या माहामारी मुळे सर्वत्र थैमान घातलेले आहे. बऱ्याच लोकांचे उद्योगधंदे सुद्धा गेलेले आहे. त्यात मे, जुन हा महिन्या प्रामुख्याने शेती मशागत करणे, बि-बियाणे खरेदी करणे, शेती उपक्रमण दुरुस्त वा खरेदी करणे व रासायनिक खते खरेदी करणे इत्यादी कामे शेतकरी करीत आहे. तसेच मागच्या वर्षीही कोविड-१९ मुळे शेती करण्यास भरपुर अडचण निर्माण झाली होती. ते जग जाहिर आहेत. त्यात या वर्षी कोविड-१९ ची दुसरी लाट व संभाव्य तिसरी लाट येण्याचे संकेत केंद्र शासनाने दिलेले आहे. या परिस्थीत शेती करणे अत्यंत कठीण झाले असून शेतकऱ्यांकडे त्याचे शेती करण्यासाठी व बि-बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही. अशा गंभीर परिस्थित केंद्र शासनाने रासानिक खताचे दर अचानक पणे वाढलेले आहे. उदा. १०:२६:२६ हे अगोदर १२००/- रु. मिळत होते से आता ते १७५०/- रु. मिळतांना दिसत आहे. ३:१६ हे अगोदर ९५०/-रु. मिळत होते. आता १४००/- रु. मिळतांना दिसत आहे. डी.ए.पी. हे पण १२००/- रु. मिळत होते आता १९००/- रु. मिळतांना दिसते. असे असतांना शेतकऱ्यांनी अशा परिस्थीत काय करावे, हा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला आहे. आपला देश हा शेती प्रधान असल्याने शेती हा प्रमुख घटक आहे. पण केंद्र शासनाच्या अशा वागणुकीमुळे शेतकऱ्यांनी जावे तरी कुठे असे असतांना या मांगणीकडे गांभीर्याने लक्ष द्याल व रासायनिक खताचे भाव त्वरीत कमी करण्यात यावे, असे निवेदनात म्हंटले आहे.