जळगाव (प्रतिनिधी) भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला. सोंगाड्या चित्रपट निघाला असता संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच भूमिका मिळाली असती, असे महाजन म्हणाले.
खार पोलीस स्टेशनबाहेर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांनी जखम झाल्याचा दावा केला होता. सोमय्यानी ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला. या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप नेते आणि गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी महाजन म्हणाले की, ‘जखम किती होती याला महत्व नाही, हल्ला झाला, दगडफेक झाली हे महत्वाचे आहे.’ टोमॅटो सॉस होता तर तुम्ही त्याची चव घेतली का, गोड वाटलं का, असा सवाल महाजन यांनी केला आहे. त्यांनी संजय राऊतांवर टीका करताना म्हटलं आहे की, ‘सोंगाड्या चित्रपट निघाला असता संजय राऊत यांनाच भूमिका मिळाली असती.’
सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा : राऊत
आमच्या हातातली हिंदुत्त्वाची गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायची आहे, त्यांच्या डोक्यावर जाऊन आपटेल, असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस सध्या राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. जे अस्वस्थ नेते आहेत, अशांत नेते आहेत, त्यांनी आपल्या घरी हनुमान चालिसाचं पठण करावं, त्यांच्या मनाला शांती मिळेल असाही खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यासोबत किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे.