जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडीच्या कार्यक्रमावर लागून राहिलेलं होते. मात्र, आता प्रतीक्षा संपली आहे, कारण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीचा कर्यक्रम जाहीर केला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. दरम्यान जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सरपंच निवडीचा कर्यक्रम जाहीर केला आहे. १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान सभा घेऊन सरपंच आणि उपसरपंचांची निवड करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहे.