मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शाळा मार्च २०२० पासून कोरोनामुळे बंद आहेत. शाळा सुरू न झाल्याने पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल इथल्या गोदामात पुस्तके पडून आहेत. आता ही ४२६ मेट्रीक टन पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने टेंडर काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मात्र शाळा बंद असूनही बालभारतीने लाखो शालेय पुस्तके छापली आहेत. शाळा बंद असूनही बालभारतीने पुस्तके का छापली ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पुस्तके छापली, मात्र शाळा सुरू नसल्याने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यातच आली नाहीत. त्यामुळे ही सर्व पुस्तके बालभारतीच्या विविध गोदामांमध्ये पडून आहेत. आता ही ४२६ मेट्रीक टन पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने टेंडर काढले. पेपर मिल्सकडून टेंडर मागवण्यात आले आहे.