TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील माता मृत्यू दरात लक्षणीय घट ; आशा व आरोग्य सेविकांचे अथक प्रयत्नाचे फलित !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2023
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील माता मृत्यू दरात मागील तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.२०२२-२३ मध्ये ४१ माता मुत्यू झाल्या होत्या. एप्रिल २३ ते नोव्हेंबर २३ या आठ महिन्यात ११ माता मुत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाबरोबरच दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांची कामाप्रती निष्ठा व समर्पण वृत्ती यामुळे मातांची प्रसुती वेळेवर व सुरळीत करणे शक्य झाले. याकारणाने माता मुत्युदरात लक्षणीय घट झाली आहे.
प्रसूतीच्या दरम्यान ओढवणारे मातांचे मृत्यू ही माता मुत्यू मागील सर्वात जास्त कारण आहे. जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षी २९ माता मूत्य झाले होते. यात ग्रामीण भागात २१ व महानगरपालिका हद्दीत ९ माता मुत्यूचा समावेश होता. २०२१-२२ या वर्षी ४० माता मूत्य झाले होते. यात ग्रामीण भागात १६ व महानगरपालिका हद्दीत २४ माता मुत्यूचा समावेश होता. २०२२-२३ या वर्षी ४१ माता मूत्य झाले होते. यात ग्रामीण भागात ८ व महानगरपालिका हद्दीत ३३ माता मुत्यूचा समावेश होता. एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत ११ माता मूत्यु झाले आहेत. यात ग्रामीण भागात ५ व मनपा हद्दीत ६ माता मुत्यूचा समावेश आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविका पावसाळ्याच्या दिवसांत तापीला पूर आलेला असतांनाही जीवाची पर्वा न करता प्रसूतीसाठी नदी ओलांडून गाव-पाड्या वस्त्यांवर पोहचतात. यामुळे मातांची प्रसूती वेळेवर होते. यातून महिलांचा मृत्यू ही ओढावत नाही. अमळनेर तालुक्यातील सात्री येथे पुराचा वेढा असतांनाही पोलीस पाटलांच्या मदतीने वैद्यकीय पथकाने जीवाची पर्वा न करता बाळ व बाळंतिणीचा जीव वाचविण्याची घटना मागील काही महिन्यांपूर्वीच घडली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी‌ डॉ.विवेकानंद बिराजदार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे यांच्या पथकाने सातपुड्याच्या जामन्या – गाडऱ्या सारख्या असंख्य दुर्गम पाड्यांवर भेटी देत आरोग्य व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेतला आहे. मातामृत्यु कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या. यामध्ये जिल्ह्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर गुरुवारी गरोदर माता तपासणीसाठी एक दिवस ठरविला. त्यामध्ये अतिजोखमीच्या मातेची तपासणी, उपचार व संदर्भसेवा दिली जाते. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियान घेवून त्यामध्ये दुस-या व तिस-या तिमाही तील गरोदर मातांची तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून करण्यात येवून अतिजोखमीच्या मातांना आवश्यकतेनुसार उपचार व सल्ला देण्यात आला.
मानव विकास कार्यक्रम जिल्ह्यात ७ तालुक्यामध्ये (अमळनेर, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर) राबविण्यात येतो, यामध्ये ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक महिन्यात २ शिबीर घेवून बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गरोदर माता व बालकांची तपासणी करण्यात येते. यामध्ये गरोदर मातेला प्रसुती आधी २ हजार रूपये व प्रसुती नंतर २ हजार रुपये अशी एकूण ४ हजार बुडीत मजुरी दिली जाते. अतिदुर्गम भागात भेटी देवून कार्यक्रमाचे संनियत्रण, मुल्यमापन करून मार्गदर्शन केले जाते. अति जोखमीच्या मातांची यादी करुन त्यांचा पाठपुरावा करण्यात येतो.
तीव्र रक्तक्षय असणा-या मातांना इंजेक्शन आर्यन सुक्रोज देवून आरोग्य सेविका व आशा मार्फत पाठपुरावा करण्यात येतो. स्थलातंरीत शेतमजुर, उसतोड कामगार, वीटभट्टी कामगार व बांधकामांवर असलेले मजूर यांचे आशा व आरोग्य कर्मचा-यांमार्फत वेळोवेळी सर्व्हेक्षण करण्यात येते. या उपाययोजनांचे फलित म्हणून माता मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे.
“जिल्ह्यातील आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजना तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांनी समर्पित भावनेने केलेल्या कामांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.”अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
Next Post

पाडळसे प्रकल्पाचा जलसाठा वाढविण्यासाठी आवश्यक निधी द्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज

April 3, 2021

मुंबईत कोविड रुग्णालयात आग ; एकाचा मृत्यू

October 13, 2020

सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? ; राऊत यांचा भाजपाला गर्भित इशारा

February 14, 2022

मराठी कधीच मरणार नाही : राज ठाकरे

February 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group