TheClearNews.Com
Saturday, December 13, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकलाय’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 25, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विधीमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर खोचक शैलीमध्ये उत्तरे दिली आहेत. रावणाचा जीव जसा बेंबीत होता तर काहींचा जीव मुंबईत अडकला आहे. असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली आहेत. त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळाबाबत आपली मते मांडली आहेत. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, आपण किमान राज्यपालांना बोलू द्यायला हवं होतं. त्यांना राष्ट्रगीताला तरी थांबू द्यायला हवं होतं. मात्र, काल देवेंद्र फडणवीसांनी ज्याप्रमाणे विंदा करंदीकरांची ‘तेच ते तेच ते’ कविता ऐकवली, त्याचप्रमाणे ‘दाऊद एके दाऊद’ करुन त्यांचे आमदारही वागताना दिसले.

READ ALSO

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी – आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

विंदांच्या कवितेप्रमाणे देवेंद्रजी तुम्हीही तेच करत राहिला
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, मला खोटं बोलता येत नाही. राज्यातले विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे जातो आहे. किमान राज्यपाल काय म्हणतायत, ते तरी आपण ऐकून घ्यायला हवं होतं. काल देवेंद्र फडणवीस यांनी विंदा करंदीकर यांची ‘तेच तेच आणि तेच तेच’ कविता ऐकवलीत तशीच तुम्ही ‘दाऊद एके दाऊद’ करुन दाखवलं. मात्र, तुम्ही राज्यपालांचं भाषण ऐकायला हवं होतं. त्यांना राष्ट्रगीतांला तरी थांबू द्यायला हवं होतं. विंदांच्या कवितेप्रमाणे देवेंद्रजी तुम्हीही तेच ते करत राहिला, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मग समाजसुधारकांचं अनुकरण कसं करणार?
मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधक तक्रारी करायला राज्यपालांना फक्त भेटतात. राज्यपालांचं भाषण ऐकलं नाही, मग समाजसुधारकांचं अनुकरण कसं करणार? अनेक योजना ते सांगणार होते, मात्र, ते ऐकूच दिलं नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही सर्वांच्या सूचनांची नोंद घेतो आणि त्यानुसार कारवाई करतो. मी आज तळमळीने बोलणार आहे. कारण मला खोट बोलता येत नाही. राज्यपालांच्या अभिभाषणाचं मला दुःख आहे. राज्यपाल एक संवैधानिक पद आहे. आपण अधिकार मानतो. आपण प्रथा-पंरपरा पाळल्या पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप घ्यायचा आहे घेऊ शकता. पण, राज्याची संस्कृती आहे प्रथा आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेला गोंधळ अशोभनीय होता.

रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत
पुढे मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवारांना उद्देशून म्हटलं की, तुम्ही काल राज्याला मद्यराष्ट्र म्हणालात. मात्र, मी तुम्हाला मध्य प्रदेशचं उदाहारण देऊन सांगतो. देशात सर्वांत कमी दारुची दुकाने महाराष्ट्रात आहेत. मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक दुकाने आहेत. आपल्या राज्याची बदनामी योग्य नाहीये. राज्यपालांनी सांगितलेला विकासही तुम्ही लोकांसमोर येऊ देत नाहीये. रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत आहे. देशात सत्ता असली तरी काहींचा जीव मुंबईत गुंतलाय. माझ्या मुंबईत जे काही करणार ते जगातला सर्वोत्तम असलंच पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. 8 भाषातून शिक्षण देणारी जगातील पहिली महापालिका मुंबईची आहे. घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्ट्यात मोठ्या प्रमाणावर शौचालये बांधली आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

December 11, 2025
राजकीय

परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी – आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

December 10, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
चाळीसगाव

कोणता झेंडा घेऊ हाती ? शिंदे सेनेच्या उमेदवारांची किशोर पाटलांच्या भूमिकेमुळे उद्दीन प्रतिक्रिया, शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात शहर विकास आघाडीचा प्रचार करणार

November 28, 2025
अमळनेर

अवैध धंद्यांतून पैसे कमावणाऱ्यांनी चारित्र्याच्या गोष्टी करू नयेत… ; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा माजी आमदारांवर निशाणा

November 25, 2025
चाळीसगाव

माजी नगरसेविका व प्रभाग क्र.१० मधील अपक्ष उमेदवार सौ. अलका सदाशिव गवळी यांचा भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा…

November 24, 2025
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २६ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात प्रेमी युगलाने लग्नाआधीच उचललं टोकाचं पाऊल !

February 5, 2024

मास्कधारी लुटारूंनी एकाला मारहाण रोकड लुटली ; रावेर पोलीस दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा !

June 10, 2023

नितीश कुमारच मुख्यमंत्री, आम्ही दिलेला शब्द पाळतो – फडणवीस

November 11, 2020

धक्कादायक : चाळीसगावात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; आरोपीस अटक !

November 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group