रायगड (वृत्तसंस्था) मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातत झाला कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचा समावेश आहे. रिवान दर्शन तावडे (वय वर्षे ३), रित्या दर्शन तावडे ( वय ६ महिने) आणि वैशाली विजय तावडे (वय वर्ष ७२) अशी मृतांची नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, बोरीवली येथील तावडे कुटुंबीय आपल्या कारमधून देवगडला कोकणात जात होते. यावेळी माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात दोन लहान नातवांसह आजीने आपला जीव गमावला तर दर्शन तावडे आणि श्वेता तावडे हे दोघे जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कार आणि ट्रकमधील धडक एवढी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. दरम्यान, या अपघातामुळे मुंबईतल्या बोरीवलीच्या तावडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.