TheClearNews.Com
Tuesday, January 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मराठा आरक्षण बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारनं केलंय : निलेश राणे

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा आरक्षण भाजपाच्या फडणवीस सरकारने पाच वर्षे टिकवले, ते बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज जळगावात एका पत्रकार परिषदेत केला. मराठा समाजाला एकत्र करून त्यांचे तीव्र आंदोलन भाजपाच्या माध्यमातून उभे करणार असल्याचा इशारा देखील यावेळी राणे यांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आढावा घेण्यासाठी निलेश राणे हे राज्यात दौरा करत आहेत. ते सोमवारी जळगावात आलेले होते. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

READ ALSO

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

जळगाव परिमंडळात सव्वाचार लाख स्मार्टमीटर

मराठा आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला. विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सरकारमधील मंत्र्यांना विषय लक्षात येत नाही, एकही अभ्यासू व्यक्ती या सरकारमध्ये नाही. मराठा आरक्षणाचा विषय आता पेटत चालला आहे, तो आता थांबणार नाही. आजपर्यंत सरकार खोट बोलले, तेच त्यांच्या अंगाशी येत आहे. आरक्षण टिकले नाही. त्याला ठाकरे सरकार कारणीभूत आहे. वेगवेगळ्या राज्यांचे जे संदर्भ द्यायचे असतात, ज्या नोंदी द्यायच्या असतात, ते संदर्भ ठाकरे सरकारने आणि त्यांच्या वकिलांनी दिलेच नाहीत. कारण मराठा आरक्षणासाठी त्यांनी संघटितपणे बैठकच घेतली नाही. अशोक चव्हाण हे समितीत असल्याने आरक्षण मिळणार नाही, ते न्यायालयाकडून नाकारले जाणार हे आम्हाला आधीच माहिती होते. ठाकरे सरकारने अहवालात मराठी भाषांतर केले पण ॲनेक्चरमध्ये केले नाही. जे न्यायाधीश बसले आहेत त्यांना काय मराठी वाचता येत नाही. म्हणून हे सारे जाणूनबुजून झाले आहे का? तर हो माझ्या मनात ही शंका नाही तर हे जाणूनबुजून झाले आहे. भोसले समिती बसली, त्यांनी आम्ही जे सांगत होतो, तेच सांगितले आहे. एकही वाक्य इकडे तिकडे नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही रिव्ह्यू टाकू शकत नाही, असे म्हटलेले नाही. रिव्ह्यू केंद्र सरकारने टाकला पण राज्य सरकारने अजूनपर्यंत टाकला नाही. आरक्षणासाठी मागास आयोग स्थापन करावा लागेल, हे सरकारच्या महिना दीड महिन्यापूर्वी लक्षात आले. मागासलेपणा सिद्ध झाल्यानंतर तो अहवाल राज्यपाल आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे जातो. मग काय हवी ती घटनादुरुस्ती होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही आहे, असे वाटत नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही माहिती नाही, अशातच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे, असे राणे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या विषयातील कुठलाही तांत्रिक मुद्दा उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता स्पष्ट करावा, मी काहीही हरायला तयार आहे, असे थेट आव्हान निलेश राणेंनी यावेळी दिले. ठाकरे बोलूच शकत नाही, कारण त्यांचा अभ्यासच नाही. मराठ्यांना आरक्षण देणे त्यांच्या मनातच नाही. फक्त फिरवत बसवायचे, लटकवत ठेवायचे. हेच सरकार करत आहे. फडणवीसांनी जशी बाजू मांडली होती, तशी बाजू मांडली असती तर आज हा विषयच आला नसता, असेही त्यांनी सांगितले.

तेव्हाचे महाधिवक्ता कुंभकोणी हे सुनावणीलाच जात नव्हते, ते का जात नव्हते. अशा अनेक त्रुटी, बोगसपणा सरकारने केल्यामुळे आज मुडदे पडूनही मराठ्यांना आरक्षण मिळालेले नाही. हात पसरून झाले, आंदोलने करून झाली. आता मराठे तीव्र आंदोलन कधी करतील, याची वाट ठाकरे सरकार पाहत आहे. पण तो दिवसही दूर नाही. मराठे घरात घुसून तुमच्याकडून हक्काचे घेतील, हे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी लक्षात ठेवावे. अनेक नेते आता आपापल्या परीने आंदोलनाचा इशारा देत आहेत. भाजपा मराठ्यांना एकत्र करून तीव्र आंदोलन उभे करत आहे. त्याची पुढची रूपरेषा लवकरच कळेल, असेही निलेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना यात रस आहे, असे वाटत नाही, या सर्व कारणांमुळेच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे. हातात कागद न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांना यातील एक मुद्दा देखील सांगता येणार नसल्याची टीकाही यावेळी निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीला जाणार आहेत, यावर बोलताना त्यांची आरती ओवाळायची का ? म्हणत ते घरातून बाहेर निघाले तेच खूप आहेत. असा टोलाही राणे यांनी लगावला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
जळगाव

जळगाव परिमंडळात सव्वाचार लाख स्मार्टमीटर

January 26, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
जळगाव

जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता हुकला ; अंगणवाडीसेविका करणार पडताळणी

January 25, 2026
गुन्हे

दोघांना १३ लाखांचा ऑनलाईन गंडा

January 25, 2026
Next Post

Pin Up Casino: Rəsmi Veb Saytında Onlayn Casino Oynayın

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी !

October 26, 2021

मोदी 2 तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न : चंद्रकांत पाटील

March 20, 2022

अमळनेर : मंगरूळला घरफोडी ; मोबाईल,सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

July 20, 2022

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ८४ कोरोनाबाधित !

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group