जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेच्या बळीराम पेठ शाखेतर्फे अमृतयोजनेमुळे ठिकठिकाणी चाऱ्या खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. रात्री खड्ड्यांमुळे अपघात होत असतात यामुळे शिवसेनेतर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे यांनी यावेळी या आंदोलनस्थळी भेट दिली. दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे महापौरांनी या आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले आहे.
तसेच शिवसेनेतर्फे ठेकेदाराला जाग यावी यासंदर्भात ठेकेदाराचा निषेध करत शिवसेनेच्या बळीराम पेठ शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. महापौर भारती सोनवणे यांनी भेट दिली असता ठेकेदाराची कानउघडणी करून दोन दिवसात हे काम पूर्ण करण्याचे ठेकेदाराला सांगितले आहे. दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे महापौरांनी या आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले आहे. या आंदोलना प्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख विपीन पवार, उपविभाग प्रमुख जितेंद्र गवळी, निर्भय पाटील, उमेश तायडे, गणेश गवळी, रुपेश पाटील, ललित भोळे याप्रसंगी उपस्थित होती.
















