चोपडा (प्रतिनिधी) अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली होती. त्याच धर्तीवर सातपुड्यात हा नियम कठोरतेने अंमलबजावणी केला तर हजारो झाडे वाचु शकता. त्यामुळे वनमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी मागणी आता जोर धरू लागली.
सातपुड्यातुन रोजच शेकडो झाडाची तसेच रस्त्याच्या दुतर्फावर असणाऱ्या झाडाची कत्तल सर्रास होत असते. या कत्तलसाठी फॉरेस्टचे मोजण्या इतके कर्मचारीच जबाबदार असल्याचे बोलले जाते. हेच कर्मचारी लाकडाची भरलेली गाडी काही देऊन घेऊन पास करत असल्याचे बोलले जात आहे. चोपडा शहरातून रोज जवळपास आठ ते दहा गाडी पास होत असतात असे ही बोलले जाते. परंतु असेच काही कर्मचारी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जी राखण्यात पटाईत आहे त्यामुळे येथे कोणीही विरोध करत नाही इतकेच काय ? स्थानिक आर.एफ. ओ.यांना सुध्दा कळु देत नाही. त्यामुळे स्थानिक आर.एफ.ओ. सुद्धा या बद्दल अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे.
तरी चोपडा तालुक्यातील अवैध वृक्ष तोड सापडली तर जागेवर 50 हजार रुपये दंड ठोकायला हवा.आणि त्यात सामील कर्मचारीवर त्याच जागेवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरीत आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम १९६४ अन्वये १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो; मात्र हा दंड कमी असून, यामध्ये आता अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.