धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांच्या जन्मदिनाप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा व आयटीआय कट्टा मित्र परिवाराच्यावतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये खान्देशातील प्रसिद्ध साहीत्यीक – कवीवर्य, प्रा.बी एन चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख भरत माळी, कॉन्ट्रॅक्टर मोहन महाजन, नूतन कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र महाजन, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी राहुल रोकडे या वरील महनीय व्यक्तींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या पाचही मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सत्कारार्थींना शिवाजी कोण होता, महात्मा फुले आणि धर्म, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, शेतकऱ्याचा आसूड, राजर्षी शाहुजी महाराज चरित्र, मुक्ती कोण पथे, आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं, एनआरसी, एनपीआर, सीएए, असे महापुरुषांच्या विचारांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ साहित्यीक, कविवर्य प्रा.बी.एन.चौधरी उपस्थितांना म्हणाले की, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले. म्हणून वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. तसेच, पुस्तक हे मस्तक घडवतं आणि घडलेलं मस्तक हे कधीच कुणापुढं नतमस्तक होत नसतं. म्हणून चांगली पुस्तकं घरोघरी गेली पाहिजेत. असे समाजोपयोगी उपक्रम राबविणारे पुस्तक मित्र, वृक्षमित्र, सर्पमित्र आबासाहेब राजेंद्र वाघ व मित्र परिवाराचा उपक्रम खुपच वाखाण्याजोगा आहे. असेही चौधरी यांनी सांगितले.
यावेळी आय टी आय कट्टा प्रमुख सुनील लोहार, गोरख देशमुख, नंदलाल महाजन, ऍड. विक्की पाटील, ऍड. शरद माळी, ऍड. विक्रम परिहार, महेंद्र तायडे, पंकज पवार, सागर ठाकरे, दिपक वाघमारे, विजय सोनवणे, आय टी आय चे दिलीप वाघ सर, संतोष मेढे सर, एस आर चव्हाण तसेच, मनोज निकम, बबलू मराठे, भरत शिरसाठ, देवानंद चव्हाण, प्रदीप पगारे, दिनेश चौधरी, अनिल चौधरी, समाधान महाजन, गौरव तावडे, गणेश गुरव आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी व्ही. टी. माळी यांनी सांगितले की, वाढदिवसाप्रसंगी प्रत्येकाने “बुके न देता बुक द्यावे. व पुष्पगुच्छ ऐवजी वृक्ष द्यावे.” असेही माळी यांनी सांगितले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत दिनेश पाटील, पष्टाणेकर यांनी तर, आभार निलेश पवार यांनी व्यक्त केले.